भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
रविवार दिनांक २३ आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.आळंदी मधील श्री गोपाळ मंगल कार्यालय, चाकण चौक या ठिकाणी के.एस.आय.पब्लीकेशन इंगळी, कोल्हापूर आयोजित ३० ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांच्या अकराव्या पुस्तकाचे ( काव्य संग्रहाचे) प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.
या साहित्य संमेलनात सुरुवातीला रोहिदास गावकर आणि मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, मान्यवरांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.पुस्तक प्रकाशन , मान्यवरांचे स्वागत सत्कार व मार्गदर्शन झाले.कवी संमेलन ,कथा कथन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रास्ताविक, असे भरगच्च कार्यक्रम या ग्रामीण साहित्य संमेलनात संपन्न झाले.
प्रास्ताविका मध्ये इंगळी सरकार विलास पाटील यांनी उपस्थित साहित्यिकांचे आभार मानले, सूत्रसंचालन सनिता क्षीरसागर आणि अशोक मोहन यांनी केले.
या वेळी दिपक पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ," छोटी मुक्ता ज्ञानेश्वरांना म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा या भक्तीमय काव्य रचनेचे फार सुंदर वर्णन केले, कांदबरी कार श्रीकांत पाटील यांनी सांगितले की," संताचे ज्ञान हे या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे, नव्या साहित्यिकांना हे व्यासपीठ आपले वाटले पाहिजे,निंदकाचे घर शेजारी असल्याने आपल्या लिखाणात सुधारणा होते, तारुण्यात चारित्र्य बिघडण्याची शक्यता असल्याने नव साहित्यिकांरानी आपले लक्ष साहित्यात घालावे, देवालयात गेला नाही तरी.चालेल, पण वाचनालयात जावे, चांगले लिहिले की समाज दखल घेत असतो.
संमेलन अध्यक्ष दशरथ धायगुडे या वेळी म्हणाले की," माऊली च्या पावन भूमीत हे संमेलन संपन्न होत असल्याचा आनंद वाटत आहे, मला या साहित्य संमेलनामुळे एक नवीन उर्जा मिळाली आहे, मराठी भाषेला चांगले दिवस आले आहेत हे आजच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या संख्येवरून दिसून येत आहे, समाजातील अन्यायाविरुद्ध आपलं साहित्य वापरावे,आसूड ओढणारै साहित्य निर्माण करावे,या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.
या प्रसंगी माया नवथर, वेणू माधव, अशोक मोहिते विलास पाटील इंगळी सरकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

