भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण साहित्य माजी प्राचार्य रवींद्र येवले हे होते.
यावेळी या कार्यक्रमास मध्य विभागाचे माजी विभागीय अधिकारी शिवाजीराव देशमुख, जनरल बॉडी सदस्य भायगुडे, जनरल बॉडी सदस्य सुनेत्रा पवार, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे,पांडुरंगचे संचालक भगवान चौगुले,वामन सराटे, सरपंच राजकुमार पाटील, शेंडगे वाडीचे सरपंच आबासाहेब शेंडगे,शिंदे गट शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर ,एस डी पवार, दाऊद शेख,भीमराव जाधव, धोंडिराम शिंदे,नाना कौलगे,विठ्ठल चौगुले, नितीन शिंदे, लुकमान इनामदार, अरुणा म्हेत्रे, भोजलिंग बाबर अर्जुन गवळी, प्रभाकर गवळी,प्रशांत माळवदे, तानाजी पाटील माजी प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या गेटच्या बांधकामाचे भूमिपूजन , पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, रांगोळी ,फुल रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी या महाविद्यालयास पाण्याची टाकी बांधून देणारे गुरुकृपा कंट्रक्शनचे मालक सिताराम माने व रायगड किल्याच्या कल्याण दरवाज्याची प्रतिकृती तयार करणारे शिक्षक गोंजरी,खरात,विद्यार्थी यश माने,प्रथमेश काटे,तेजस सुतार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध शालेय स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले,की या महाविद्यालयाची निकालाची परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या शाळेचे प्राचार्य गायकवाड यांनी काटकसर करून एवढी मोठी इमारत बांधली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. श्रीमंत माणूस हा श्रीमंत नसतोच तर तो त्याचा पैशाचा उपयोग योग्य ठिकाणी करतो तोच खरा देणगीदार व श्रीमंत असतो.
यावेळी येवले म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. आपल्या शरीरवरच विज्ञान आणि गणिताच्या आधारित शरीर कार्य करीत आहे. त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वेळेवर आहार वेळेवर अभ्यास केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एन एम गायकवाड यांनी केले तर अहवाल वाचन एस जी जरे व बक्षीस वितरण एस ए शिंदे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पी आर गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार रणजीत दडस यांनी मानले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक,शिक्षीका,कर्मचारी ,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. यावेळी या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक ,शिक्षक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.