पंढरपूर प्रतिनिधी दादासाहेब कदम तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचा सुपुत्र आणि पारगाव येथील एबीपी शिक्षण समूहातील विद्यार्थी शिवराज उमेश कदम या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 98.80 टक्के गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.
शिवराजच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ए. बी. पाटील, सचिव अमोल पाटील, राजलक्ष्मी पाटील, संचालिका आकांक्षा पाटील, प्राचार्य एस आर पाटील, शिक्षक, कर्मचारी, रोपळे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच या यशासाठी शिवराज यास एबीपी शिक्षण समूहातील शिक्षक, कर्मचारी, वडील उमेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.