तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत आरबीआयकडून करण्यात आला खुलासा
बँक बुडाल्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की भारतामधील सर्वात सुरक्षित बँक कोणती असू शकते? याबाबत आरबीआयकडून नुकतीच एक दहा बँकांची यादी जारी करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉटन्सच्या आधारावर दहा बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या दहा बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका मानल्या गेल्या आहेत.
एखादी पतसंस्था किंवा वित्त संस्था गुंतवणूकदारांना जास्त पैशांचे आमिष दाखवते, आशा पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त व्याज देतात, मात्र त्या बुडण्याचा धोका देखील बँकांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा पतसंस्थांमध्ये किंवा इतर वित्त संस्थामध्ये जे गुंतवणूकदार एफडी करतात ते राष्ट्रीयकृत बँकातील गुंतवणूकदारांपेक्षा जास्त रिस्क घेत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यभराची जमापुंजी सुरक्षित राहावी यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.