चेंबूर प्रतिनिधी तेज न्यूज
चेंबूर येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनी स्वाती (नाव बदललेले) हिच्यावर सहली दरम्यान तिच्याच शाळेतील लॅब असिस्टंट याने १७/११/२०२२ मध्ये अतिप्रसंग केला घाबरलेल्या, भेदरलेल्या या मुलीने आई वडील आणि कुणाला या प्रकाराची माहिती दिली नाही, तिच्या दहावीच्या परिक्षेचा ताण पण तिच्या वर होता, पण बदलापूरची घटना घडल्यावर मुलीला आपल्या वर घडलेल्या प्रसंगाची आठवण फारच त्रास द्यायला लागली व तिने हिंमत गोळा करुन त्या शाळेतील लॅब असिस्टंट वर दि 30/09/2024 रोजी गोवंडी पोलिस ठाण्यात पाॅसको अंतर्गत गुन्हा दाखल केला, ३०/०९/२०२4 रोजी ० एफ आय आर ची नोंद करुन गुन्हा नेरळ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला व ४ दिवस लोटून सुद्धा पोलिसांनी अटक न केल्याने व टाळा टाळ केल्याने अखेर आरोपीस १६/१०/२०२४ रोजी अंतरिम जामीन मिळाला, १६ दिवसात पोलिसांनी आरोपीस अटक का केली नाही, त्यांचे, आरोपीचे व शाळा मुख्याध्यापकांचे साटेलोटे होते का हा प्रश्न उपस्थित राहतो, शिक्षण निरिक्षक मुश्ताक शेख यांना वारंवार भेटुन त्यांनी शाळेवर ठोस कार्यवाही केली नाही आपल्या वरिष्ठ आणि शासनास कळवले नाही असा पिडितेचा आरोप आहे, शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांचे म्हणणे आहे या आधी देखील मुश्ताक शेख यांनी शाळांना पाठीशी घातल्याचे दळवी यांनी तक्रार दाखल केली होती, त्याची चौकशी प्रलंबित आहे, पण एवढ्या गंभीर प्रकरणी शाळेला पाठीशी घालणे करतव्यकसुरता तर आहेच पण माणुसकीला काळीमा फासणारी आहे आजच्या पत्रकार परिषदेत दळवी यांची मागणी आहे आरोपीला आणि प्रकरण दडपणाऱ्या मुख्याध्यापिकेला तर अटक करावीच पण मुश्ताक शेख यांना सेवेतुन बडतर्फ करावे, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यास टाळा टाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना हि निलंबित करावे.
दरम्यान जानेवारीत आरोपीला परत शाळेत रुजु केले गेले, त्याचा जाब विचारल्यावर शाळा मुख्याध्यापकांनी टाळा टाळ तर केलीच पण पिडीतेला शाळेत येण्यास बंदि केली, मुश्ताक शेख यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली व वारंवार पिडीतेने फोन करुन सुदधा प्रतिसाद दिला नाही, या सर्व प्रकारावरून दिसुन येते कि सरकारी यंत्रणा, पोलिस, शाळा मुख्याध्यापिका या आरोपीला व शाळेला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
महिला आयोगाला तक्रार दाखल केल्यावर त्यांनी शालेय शिक्षण विभाग यांना चौकशीचे आदेश दिले व शिक्षण विभागाने मुंबई उपसंचालक यांना चौकशीचे आदेश दिले आता परत फिरुन हे प्रकरण शिक्षण निरीक्षक दक्षिण मुशताक शेख यांच्या कडेच जाणार, विद्यार्थीनीनी शोशल मिडिया व वृत्तपत्रात अगोदरच वाचले आहे कि उपसंचालक संदिप संगवे व मुश्ताक शेख हे शाळांना पाठीशी घालण्याचे काम करतात म्हणून तिने नितीन दळवी यांची न्याया साठी मदत मागितली.
शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे कि आरोपीस तातडीने अटक करावी, मुख्याधिपिकेवर गुन्हा दाखल करुन अटक करावी, शाळेला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण निरिक्षक मुश्ताक शेख यांना सेवेतुन बडतर्फ करावे, व आरोपीस अटक न करता टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कार्यवाही करावी. तातडीने कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल.
नितीन दळवी,
शिक्षण हक्क कार्यकर्ता
9987422359