सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडयम स्कुल चे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हॉटेल सूर्या इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राष्ट्रगीताने ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.अंजली तिवारी मॅडम व शिक्षकवृंद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यातआले .यावेळी मान्यवर पाहुण्यांचा शाल श्रीफळ, भेट वस्तू, व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील आठवणी सर्वजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवत असतात. त्या आठवणी श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडयम स्कुलच्या १९९६ च्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी व शिक्षकांसमवेत जाग्या केल्या. निमित्त होते स्नेहमेळाव्याचे.! शिक्षकांनी केलेले सुसंस्कार, चुकीच्या वेळी केलेली ती शिक्षा,वर्गातील गमती जमती,परीक्षेचा तणाव,निकालाची उत्सुकता,अशा अनेक आनंदी,तर काही भावनिक आठवणीना उजाळा देत श्री.सिध्देश्वर इंग्लिश मिडयम स्कुलच्या १९९६ च्या इ.१० च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हॉटेल सूर्या इंटरनॅशनल, सोलापूर येथे उत्साहात पार पडला.तब्बल २८ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला.
आशा थळंगे व श्वेता थळंगे ह्यांनी उत्तम रित्या सूत्रसंचालन केले.
ह्या कार्यक्रमांसाठी शाळेच्या आजी व माजी मुख्याध्यापक व शिक्षक यांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते, सौ.अंजली तिवारी मॅडम, सौ.हेमलता टीचर सौ. नंदगिरी टीचर, सौ.दामले टीचर, सौ. अंटद टीचर, सौ.सिंघल टीचर ,सौ. झुंजूरवाड टीचर ,रेणुका अरोरा टीचर,सौ.शेख टीचर, सौ.बिराजदार टीचर,सौ. अवस्थी टीचर, अलमेलकर टीचर, श्री.सोमशेखर भोगडे सर,मदतनीस बनसोडे ताई उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख व शाळेतील आणि नंतर मिळवलेल्या यशाबद्दल सांगितले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभवावर मनोगत व्यक्त केले. १२ वर्षे ज्या शाळेत, दंगा, मस्ती, धिंगाणा, शिक्षा, व ज्या शिक्षकांनी योग्य शिकवण देऊन आयुष्याला आकार दिला, त्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगळे आवर्जून उपस्थित आहोत, असा भाव सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
ह्या स्नेह संमेलनासाठी सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, पुणे , मुंबई, कोल्हापूर, महाराष्ट्र बाहेरील बेंगलोर स्थाईक असलेले विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमांचे उत्तम नियोजन, शिक्षकांना येण्याजाण्यासाठी सोय,सादरीकरण, स्वागत, अल्पोपहार, कार्यक्रमानंतर भोजन हे सगळे पाहून शिक्षकांनी विद्धर्थ्यांचे खास कौतुक केले व भेट म्हणून मिळालेला व वस्तू हे आम्हाला कायमस्वरुपी ची आठवण आहे आसे मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमासाठी विद्याधर पुरंदरे, संतोष नंदीमठ, विश्वनाथ बुक्का, कृष्णा कुलकर्णी, वृषाली कटाप, गंगा कुलकर्णी, रेणुका पाटील, केदार पाटील, स्मिता करडे नितीन श्रीगांधी ह्यांनी विशेष परिश्रम घेतले. रात्रीच्या भोजनाने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.