धारावी प्रतिनिधी तेज न्यूज
अनाधिकृत शाळेवर कारवाई करताना पहिला गुन्हा दाखल झालेल्या धारावीतील अनाधिकृत मॉर्निंग स्टार शाळेवरची कारवाई न करता त्याच जागेवर नव्याने शाळा सुरू करणयाचे ईरादापत्र मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाने दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय, यामुळे अनाधिकृत शाळेवर कारवाई करण्या संबंधि शिक्षण विभागात गौडबंगाल सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी करत आहेत.
महाराष्ट्रातील ६७४ शाळांवर कारवाई करताना शिक्षण निरिक्षक दक्षिण विभागाने धारावीतील मॉर्निंग स्टार शाळेवर २०१८ पासून अनाधिकृत रित्या शाळा चालवल्या बद्दल व कायद्यानुसार रु १ लाख दंड व दिवसागणिक रु दहा हजार दंड न भरल्याने धारवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, पण कारवाई पुर्ण होत नसल्याने महासंघाचे नितीन दळवी यांनी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाला तक्रार केली होती, आयोगाने दक्षिण मुंबई शिक्षण निरिक्षक व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कारवाई पुर्ण करुन या शाळेत शिकत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांंचे दुसऱ्या अधिकृत शाळेत समायोजन करण्या संबंधि कार्यवाही चे पत्र पाठवले होते या वर बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाने या शाळेच्या प्राथमिक विभागाची शाळा चालविण्याचे मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पारित केला असुन पुढिल कारवाई साठी प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या कडे पाठवल्याचे बालहक्क आयोगास कळविले तसेच हि कारवाई करताना शाळा प्रशासनाने जागे संबंधित कागदपत्रे सादर करताना म्हाडाचे बनावट पत्र सादर केल्याने मान्यता रद्द करण्याचे कळविले, मात्र दक्षिण मुंबई शिक्षण निरिक्षक यांनी आयोगास पाठविलेल्या अहवालानुसार मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाने सदर शाळेला नविन शाळा सुरू करणयाचे ईरादापत्र देण्यात आल्याचे कळविले.
एकी कडे या शाळेवर गुन्हा दाखल केला जातो , लाखो रुपये होणारा दंड रूपात मिळणारी महसुली रक्कम वसूल केली जात नाही, शाळा बनावट कागदपत्रे सादर केल्याचा मोठा गुन्हा करते म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करते तर दुसरीकडे शालेय शिक्षण विभाग अशा अनाधिकृत शाळेला नविन शाळा सुरू करण्याचे ईरादापत्र देते यावरून अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा फक्त फार्स असल्याचा आरोप शिक्षण विभागावर महासंघाचे नितीन दळवी यांनी केला आहे तसेच या शाळेला नविन शाळा सुरू करण्याचे ईरादापत्र देणारे अधिकारी विवेक सकपाळ यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील ६७४ अनाधिकृत शाळेवर कारवाई गेल्या २ वर्षापासून सुरू आहे, पण आजतागायत किती शाळांवर कारवाई झाली, किती शाळा बंद झाल्या ,किती शाळांकडून दंड वसूल केला, अशा शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजानाचे काय? असा पारखड सवाल नितीन दळवी यांनी केला आहे व आरोप केलाय की अनाधिकृत शाळांवर कारवाई करणाचा फक्त फार्स शिक्षण विभागाने केलाय व कारवाई च्या नावाने अधिकारी मलिदाकरण करत आहेत. या सर्व शाळांवर आजतगायत काय कारवाई झाली हे शिक्षण विभागाने जाहिर करावे अन्यथा शिक्षण विभाग विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा प्रसार माध्यमांद्वारे महासंघाचे नितीन दळवी यांनी दिलाय.