करकंब प्रतिनिधी
करकंब सकाळ तनिष्का,जागर स्वच्छता अभियान टीम व श्रीराम गणेश तरुण मंडळाच्या वतीने आज करकंब येथे प्रत्येकाच्या घराघरात जाऊन गणपती पुढील १० दिवसाचे निर्माल्य फुले,दुर्वा,हार,आदी साहित्य एकत्र गोळा करून शेतामध्ये खड्या करुन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेतकऱ्याला दिलं.
खरं म्हणजे हे सर्व हार फुले विहिरीत ,कॅनाल,पाण्यातच टाकली जातात परंतू यामुळे तेथील पाणी दुषीत होणार आणि तेच आपण पिणार मग हे सर्व निर्माल्य एकत्र केलं तर निश्चितच एक सुंदर अभिनय उपक्रम ही होईल आणि पर्यावरणच रक्षण होईल या भावनेनतून सकाळ तनिष्का,जागर स्वच्छता टीम आणि श्रीराम गणेश तरुण मंडळाच्या अनमोल सहकार्याने संपूर्ण गावातून जवळजवळ ११पोती निर्माल्य गोळा करून एक सामाजिक भावनेतून सर्वांनी अनमोल सहकार्य केले.ज्या ज्या ठिकाणी जाईल त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षी गणपतीही पाण्यात न टाकता दान करावा अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त करताना हाही उपक्रम पुढीलवर्षी निश्चितच राबविण्यात येणार जागर टीमच्या वतीने सांगण्यात आले.
१)आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
२)कचरा रस्त्यावर टाकू नका घंटागाडीचा वापर करा
३) सार्वजनिक ठिकाणी शौचालायास बसू नका
४)पाण्याचा वापर काटकसरीने करा,नळाला तोट्या बसवा
५)झाडे लावा पर्यावरणाच रक्षण करा
६)आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.
वरील सर्व पोस्ट वाचण्यासाठीच हेडींग टाकलं आहे कारण गोळा केलेल निर्माल्य हे शेतात टाकल्यावर त्याच सोन्यासारख सोनखत होत हे माहितच आहे .म्हणून सर्वांना विनंती आहे वरील सुचनांचा सर्वांनी अंमल करावा.