पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता यावर्षी आपण करीत आहोत. त्यानिमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावुन कुटुंबासह अभिवादन करावे असे आवाहन अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले आहे.
हर घर तिरंगा या अभियानांतर्गत पंढरपूर प्रधान टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज विक्रीचा शुभारंभ करताना ते बोलत होते
पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच सेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात याकरिता दि १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान *हर घर तिरंगा* अभियान राबविण्यात येत असून याकरिता नागरिकांना राष्ट्रध्वज पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असून अवघ्या २५ रुपयामध्ये
ते पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत.
पंढरपूर येथील प्रधान पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीस प्रारंभ करण्यात आला,पहिला राष्ट्रध्वज अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी खरेदी करत या मोहिमेचा शुभारंभ केला. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते स्वाभिमानाने पार पाडले पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले.यावेळी अ.भा. ग्राहकपंचायतीचे सोलापूर जिल्हा सचिव सुहास निकते, टपाल कर्मचारी उपस्थित होते.
मागील वर्षीही पंढरपूर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून याकरिता विशेष मोहीम राबवुन यशस्वी केली होती.यावेळीही पोस्टमनच्या माध्यमातून जनजागृती करत ही मोहीम जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत अस आहे. नागरीकांनी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमधील विशेष काउंटरवर, आपल्या भागातील पोस्टमन बांधवाच्यामार्फत पत्राचे वाटप करताना घरपोच तिरंगा उपलब्ध होईल तरी या राष्ट्रीय कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन उदय बंडगर पोस्टमास्तर पंढरपूर यांनी केले आहे.