विशेष लेख
आजपर्यंत पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात अनेक नेते आले गेले जितके आले गेले त्यांचा प्रभाव प्रत्येकाने अनुभवला. पण मला या राजकीय नेते मंडळी मधे मनाला भुरळ घालणारे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा तरूण युवक नेता व आवडलेल नेतृत्व म्हणजे भगिरथ दादा भालके.
शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे भगिरथ दादा आज पंढरपूर तालुक्यासह मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या मनावर आधि राज्य करत आहेत.आणि कायम करत राहतील......
एक काळ होता पंढरपूर तालुक्यातील सर्व सुत्रे परिचारक घरातून चालायची आणि तालूका सुद्धा ते जे बोलतील करतील ती पुर्व दिशा मणून चालत रहायचा. पण तालुक्याचा विकास मात्र पाहिजे तितका होत नव्हता. विकासाला चालना मिळेल या आशेने जनता त्रस्त असायची पण तालुक्यातील विकास न होता अधोगती होत होती.
त्यातच एक नविन नेतृत्व तालुक्यात ग्रामीण भागातून उदयास आले व तालूका संपुर्ण राजकीय पटलानि ढवळून निघाला, ते विकासभुमुख नेतृत्व म्हणजे लोकनेता आमदार कै.. भारत नाना भालके .
ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील एक चळवळीतला कार्यकर्ता कसा राजकारणात वजीर होतो त्याच उदाहरण म्हणजे भारत नाना.मंगळवेढा तालुका मोहोळ मतदारसंघास जोडला होता. तर पंढरपूर हा एकाच राजकीय घराण्याखाली वावरत होता.
त्यातच मंगळवेढा मतदारसंघ वेगळा होऊन पंढरपूर विधानसभा मतदारसंघास जोडला व राजकीय पटलावर प्रत्येक राजकीय वरिष्ठांची नजर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर पडू लागली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा आमदारकी मिळवण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात तळ ठोकून होते, तर परिचारकांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने विजयाची कल्पना डोक्यात बसून होती.
पण ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील एक चळवळीतला कार्यकर्ता काय करू शकतो. हे कोणाच्या मनात नसतानाही ते करून दाखवणारा पैलवान भारत नाना भालके यांनी दंड न थापटता दोघाही वरिष्ठांना दाखवून दिले कि एक शेतकरी कुटुंबातील सर्व साधारण चळवळीतला कार्यकर्ता काय करू शकतो व आमदारकी वर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या विजयाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घ्यावी इतकं यश एक पठ्ठ्याने करुन दाखवलं. सोनिया गांधी यांनी स्वतः फोन करून भारत नाना भालके यांच्या विजयाची नोंद घेतली.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना योग्य निर्णय घेत कारखाना सुस्थितीत आणण्याचं काम भारत नाना नी केलं. त्याचसोबत भिमा साखर कारखाना असेल, सहकार शिरोमणी साखर कारखाना असेल, त्या त्या कारखान्याना योग्य ती मदत करुन तालुक्यातील विकासाला चालना देण्याचं काम भारत नाना नी केलं ......
पंढरपूर तालुका हा भौगोलिक स्थिती ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळख.तर पंढरपूर हे तिर्थक्षेत्र म्हणून अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध.भिमा नदी ही मुख्य प्रवाह अशा तालुक्याला योग्य नेत्याची गरज असताना नवं उमेद निर्माण करणार तालुक्यातील नेतृत्व तयार झालं व तालुक्याच्या विकास कामाला चालना मिळाली...
भारत नाना हे प्रथम उमेदवार असे होते जिथे राजकीय पक्षांची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून निवडून आले होते. तो ऐतिहासिक विजय आजही जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीना जमले नाही, ते करून फक्त भारत नाना भालके यांनी करून दाखवले ...
खरं तर आता पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे राजकारण आता ग्रामीण भागातून होयला लागले. हे बऱ्याच मोठ्या नेत्यांना पचनी पडत नव्हते.
जितके पंढरपूर तालुक्याने भारत नाना भालके यांच्या वरती राजकीय प्रेम दाखवले नाही, त्याच्या दुप्पट प्रेम मंगळवेढा तालुक्यातील जनतेने दाखवले होते. म्हणून लोकनेता आमदार म्हणून प्रसिद्धीस आले.भारत नाना आमदार असताना मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न सौडवला. व जनतेच्या मनात विकासाची ठिणगी टाकून दिली.
मंगळवेढा तालुका हा अवर्षणग्रस्त आहे. हे नानांनी त्यावेळी ओळखले होते, म्हणून जलवाहिनीच्या माध्यमातून ३५ गावचा पाणी प्रश्न सोडवण्याच काम नानांनी केले .
दोन्ही तालुक्यातील विकासाची कामे सुरू असताना, विठ्ठलालाही ही या गोरगरीब विठ्ठलाची दया आली नाही, आणि त्यातच काळाचा घाला घालावा तसा घातला आणि नाना पासून दोन्ही तालुक्याना पोरक केलं. नानाच निधन होण हे आजही गोरगरीब जनतेला मनासी नसलेला अभास आहे.
नाना गेल्यानंतर राजकीय धुरा संभाळण्याच काम आदरणीय भगिरथ दादा भालके यांच्या हाती आले. नाना सर्वांना सोडून गेले या दुखःतून बाहेर पडतो ना पडतो तोपर्यंत विधानसभेची पोट निवडणूक लागली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुक जाहिर झाली. घरातील दुःख हे घरातील उंबऱ्याच्या आत ठेवून भगिरथ दादा भालके कोणत्याही राजकीय ताकतीशिवाय पोटनिवडणुकी साठी सामोरे गेले.
निवडणूक जाहीर झाली गतवेळी नाना आमदार होते, पण त्यांच्या जाण्याने त्यांची उणीव भरून काढण्याची जिम्मेदारी भगिरथ दादा वरती होती. प्रचाराला सुरुवात झाली नाना वरती प्रेम असलेली मंडळी कोणत्याही स्वार्थाशिवाय भगिरथ दादा सोबत रणांगणात उतरून प्रचारही करू लागली.
पोटनिवडणुकीत विजय हा निश्चित होता भगिरथ दादा आमदार होणार होते, पण आमदार होता होता काही बोटावर मोजता येईल इतक्या मतांवर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
समोरून भाजपचे उमेदवार समाधान दादा आवताडे हे राजकीय मातब्बर होतेच. पण त्यांना राजकीय अनुभव नसतानाही ते आमदार झाले. आणि लोकनेत्याच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला.आजही तो पराभव जनतेला मान्य नाही. कारण जनतेच प्रेम इतक होत की तो पराभव आजही स्विकारायला जनता तयार नाही.असो जे झालं ते सोडायच व नविन कामाला जोमाने लागायचे हे ध्येय प्रत्येक राजकीय नेत्यांनी करावं तसं भगिरथ दादा करत होते.
मध्यातरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि तालुक्यात एक नविन नेतृत्व उदयास आले. ते भगिरथ दादाच्या सोबत राहून विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत पराभवास कारणीभूत ठरले.
आता तालुक्यातील जनतेला समजले असेल तालुक्यातील राजकारणात भगिरथ दादा ची गरज का आहे ?......त्यात थोड्याशा भगिरथ दादाच्या काही चुका आहेत. नानांच्या निधनानंतर पण त्या आमच्यासाठी आज महत्वाच्या नाहीत. आम्ही नेता जपतो.....
त्यांनी जनसंपर्क पाहिजे तेवढा वाढविण्यासाठी भर दिला पाहिजे होता, पण राजकीय पटलावर ठसा उमटवायचा या हेतूने कमी, पण जनतेच्या कामासाठी त्यांनी वेळ दिला. त्यातूनही वेळ काढून त्यांनी जनसंपर्क वाढविण्यासाठी भर दिला आहे. व तो आता योग्य आहे. व विकासाभिमुख निर्णय घेत हितून पुढे प्रत्येक निवडणुकीत सामोरे जावे.
ग्रामीण भागातील जनता सुज्ञ आहे. शेतकरी वर्ग विचारत्मक आहे. दादाच्या कामाचा अनुभव आज जनतेला आला आहे.त्यांच्या पाठिंशी असलेल्या वहिनी साहेब ह्या सुद्धा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मदतीसाठी दोन हात करत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद,हे ही एक आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नवउमेदच आहे......
एक दोन जय पराजयाने थकून जातील ते भगिरथ दादा कसले हो...आम्ही तरुण वर्ग आजही भगिरथ दादाच्या पाठिमागे ठामपणे उभे आहोत. ग्रामीण भागातील आता तालुक्यातील जनतेने विचार करावा की आपण योग्य आयोग्य ठरवायचं कसं.
आम्ही तरुण आजही भगिरथ दादाच्या कायम सोबत आहोत. कारण शेतकऱ्यांची व्यथा एका शेतकरी कुटुंबातील राजकीय नेतृत्वाला समजते. म्हणून आमच्यासाठी भगिरथ दादा आजही भारत नाना च्या जागीच योग्य वाटतात.
काल राजकारणात येऊन आश्वासन देणारी अनेक बहाद्दर गेल्या १० वर्षात विझलेली बघितले आहेत. आमच्या सारख्या तरूणांनी त्यामुळे भगिरथ दादा हेच आमचे राजकीय दैवत आहेत, होते व राहतील.आम्ही कायम एकनिष्ठ भगिरथ दादा सोबत राहणार.भगिरथ दादा बांधतील तेच तोरण, ते निर्णय घेतील तेच आमचे धोरण.
आजकाल आलेले राजकारणात आमच्या राजकीय कारकीर्द चा अस्त होईल, या आशेने बसलेले आहेत. त्यांच्या साठी आमचा नाद भले भले करून बसलेत. हे सांगायची वेळ आता आली आहे.
ज्यांचा दुसऱ्या तालुक्यात जनसंपर्क नाही त्यांनी तालुक्यातच शांत रहाव. वेळ पडली तर आम्ही अपक्ष म्हणून भगिरथ दादाच्या सोबत राहू, पण आमदारकीची माळ ही यावेळी भगिरथ दादांच्या गळ्यातच घालू. प्रत्येक विभागातील गावातील तरुणांनी तयारीला लागा. यंदा भगिरथ दादा हेच आमदार म्हणून बघायच असेल तर कोणताही मतभेद, मनभेद न करता निस्वार्थी मनाने कामाला लागावे. हिच कार्यकर्त्यांना सदिच्छा.
लेखन-:
✍🏻विकास सुरेश आवताडे.
आंबेचिंचोली. मो.न. ७४१०५०९७९९