सांगोला प्रतिनिधी
महावीकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदार संघातुन आमदार म्हणुन निवडुन आले...व त्यातुन जनतेच्या मनातील भावना समोर आली... त्यांच्या विरोधातील उमेदवाराने केंद्र व राज्यातील प्रमुख नेत्यांची फौज प्रचारात लावली होती...तसेच धनसंपत्तीचा वापर तर भरपुर झाल्याचे समोर आले होते..परंतु लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किती महत्त्व आसते हे या वरुन दिसुन आले.धनशक्तीच्या वापरापुढे जनशक्तीच सरस ठरली आहे. असे मत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्काची चर्चा संपुर्ण राज्यात सोशल मिडीयालाती,व इतर समाज माध्यमावरती सतत होत असते... त्यांचे नेटवर्क हे फार मोठे आहे...ते मतदार* *संघातील जनतेच्या कायम संपर्कात असतात..कुठले जरी काम असले तर ते तात्काळ फोन लावते किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटणे व काम मार्गी लावणे ही त्यांची पध्दत आहे.दिवसातुन कधीही कोणीही फोन लावला तर ते फोन उचलुन आघाडीची किंवा इतर कामांची माहीती घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करतात..कारण मतदार संघातील कोणत्याही सामाजीक, सांस्कृतिक व वयक्तीक कार्यक्रमास ते उपस्थित राहुन सहभागी होतात असे हे जनसंपर्क आसणारे नेते आहेत.
सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेला सुध्दा असाच जनसंपर्क असलेला नेते लाभले आहेत . ते म्हणजे डॉ भाई बाबासाहेब देशमुख..धंगेकर जसे जनसंपर्क असल्याने आमदार म्हणून लोकांनी निवडुन दिलेत तसेच डॉ भाई बाबासाहेब देशमुख सुध्दा जनसंपर्काच्या माध्यमातुन लोकांच्या पसंतीला नक्कीच उतरतील अशी चर्चा धंगेकरांच्या विजयाने सांगोला विधानसभा मतदार संघात झपाट्याने सुरु झाली आहे.
खरच जनता धन दौलत,पैसा आडका,दबाव याला बळी पडत नसते हे रविंद्र धंगेकरा़च्या विजयाने दाखवुन दिले...सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनता सुध्दा डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने सांगोल्यात पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ आहे.