सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक केदार माळी होते. प्रमुख अतिथी म्हणून वळसंग पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. अनिल सनगले , पोलीस पाटील श्रीमंत बिराजदार, पोलिस हवालदार बंदीछोडे आदी उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक रामेश्वर झाडे सर श्री बृहन्मठ होटगी कर्मचारी पतपेढीचे नूतन संचालक रवींद्र माळी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या शुभहस्ते श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलनाने करण्यात आले.दहावी अ व ब वर्गा कडून सर्व अतिथींचे,श्री बृहन्मठ होटगी कर्मचारी पतपेढीचे नूतन संचालक श्री रविंद्र माळी सर व सर्व गुरुजंनाचे सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता दहावीतील कु.मधुरा व्हनमाने,कु.अंजली हिरोळे,कु.मयुरी तेली,कु.शिवलिला नवले,कु.श्रावणी बिराजदार या विद्यार्थीनीने संस्था, शाळा, व गुरुजनांविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शिक्षक प्रतिनिधी गुरव सर,भानुदास राठोड ,प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.अनिल सनगले म्हणाले, विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, कष्ट,जिद्द,मेहनत घेण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक केदार माळी सरांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षा संबंधी माहिती सांगून शुभेच्छा दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सारिका बिराजदार व कु.समृद्धी बिराजदार यांनी केले तर कु.करिष्मा शेख या विद्यार्थीनीने आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कलावती कुंभार , प्रकाश कारभारी. राजमाने सर, गुंटद सर व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.