सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे जवळपास दोन वर्षात १६० लोकांचा बळी गेला असून सदरची घटना सोलापूर शहरात होणाऱ्या जडवाहतूकीमुळेच घडत असून याबाबत सोलापूर शहरातील अनेक संस्था व संघटनांनी सोलापूर शहरातील जडवाहतूक बंद करण्याबाबत मा. पोलिस आयुक्त सोलापूर यांना निवेदन व तक्रारी दिल्या असून या निवेदन व तक्रारीच्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्त सोलापूर यांनी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून या दिवसा जडवाहतुकीस घातलेल्या बंदीमुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असून जडवाहतूक बंदीमुळे सोलापूरात येणाऱ्या मालवाहतूकीतून दगड मुरुम माती खड़ी या वस्तूंमुळे शेकडो बांधकामे खोळंबले आहेत. जडवाहतूक बंदीमुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघात रोखण्यासाठी जड वाहतुकीस केलेली बंदी म्हणजे रोग रेड्याला, इंजेक्शन पखालीला असा प्रकार असून सोलापूर शहरातील खराब रस्ते, रस्त्यालगतचे अतिक्रमण, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होऊनही आत्तापर्यंत होऊ न शकलेले उड्डाणपूल, बंद असलेले सिग्रल सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण, फेरीवाले व भाजी विक्रेत्यांनी बळकावलेले पदपथ, अपघातप्रवण क्षेत्रात नो पार्किंगचा आदेश असतानाही घाबवल्या जाणाऱ्या जीप, रिक्षा, ट्रॅव्हल्स यासह अनेक घटक अपघाताला कारणीभूत असताना केवळ जड वाहतुकीला वेठीस धरणे अयोग्य आहे. दिवसा जडवाहतूक बंदीचा अंमल सुरू झाल्याने व्यापारावर परिणाम होत आहे. परगावहून आलेला माल उतरवून घेणे अथवा पुन्हा भरणे, या बाबी रात्रीच्या वेळी राक्य नाही. त्यासाठी अनेक प्रश्न व अडचणी निर्माण होत आहेत.
अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची गरज असून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. सर्व प्रकारच्या जडवाहतुकींना ठराविक रस्त्यावरूनच प्रवेश दिला पाहिजे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाचा परवाना निलंबित करून प्रसंगी वाहन ठराविक दिवसांसाठी जप्त करण्याची कारवाई केली तर बेशिस्त वाहन चालकांना वचक बसेल. त्यादृष्टीने वाहतूक शाखेच्या पोलिसाकडून आणखी चांगले नियोजन होण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरातील अनेक उद्योग व व्यवसायिकांना येणान्या समस्यांचा विचार करून मा. पोलिस महासंचालक यांनी सोलापूर शहरातील जडवाहतूक बाबत योग्य ते निकष लावून पोलिस आयुक्त सोलापूर यांना आदेश देण्यात यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.