पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील इंदिरा गांधी चौकातील रेल्वे ब्रिज खालून गेलेली पाणी पुरवठा असणारी पाईपलाईन किंवा ड्रेनेजची पाईप लिकेज झाली असून त्यामुळे तेथे वारंवार पाणी साचून चिखल तयार होत आहे. याचा परिणाम दररोज 20 ते 25 मोटारसायकल स्लीप होवून दुचाकीधारक नागरिक घसरून पडत आहेत. यामुळे नागरिकांना शारीरिक इजा होण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी सदर ठिकाणचे लवकरात लवकर पाईपचे लिकेज न काढण्यास कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा कॉंग्रेसचे नेते अमर सुर्यवंशी यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
यावेळी गणेश पांडुरंग माने, समीर कोळी, शंकर सुरवसे, शिवाजी धोत्रे, कृष्णा दशरथ कवडे, सागर शरद कदम, राजाराम गायकवाड, श्रीकांत माने, अमर गडम, बाळासाहेब आसबे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेसचे नेते अमर सुर्यवंशी म्हणाले की, इंदिरा गांधी चौकातील रेल्वे ब्रिज खालील लिकेजची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून सतावत असून याकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून या लिकेजच्या पाण्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होवू नये यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावी व यावर लगेच तोडगा काढावा अशी मागणी केली.