ईगतपुरी प्रतिनिधी- नवनाथ गायकर
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेसाठी आज निवडणुक होत असुन अपक्ष तथा तगडे उमेदवार सत्यजीत तांबे व महा विकास आघाडी ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचेत सरळ व चुरशीची लढत होतानां दिसत आहे. मात्र या निवडणुकीत तांबे यांची असलेली घट्ट पकड पाहता तेच बहुधा बाजी मारतील अशी जोरदार चर्चा आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक पहिल्यादांच एवढी गाजली आहे. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हंणजे एकाही प्रमुख पक्षाचा उमेदवार या निवडणुकीत रिंगणात नाही.ही निवडणुक अपक्ष उमेदवारांमध्येच होत आहे. महा विकास आघाडी राज्यात सर्वत्र एकत्र निवडणुक लढवत आहे.त्या अनुषंगाने नाशिकची जागा ही कांग्रेसची हक्काची आहे.आणी ती कांग्रेसला बहाल ही केली होती.मात्र असे असतानांही कांग्रेसच्या घोषित उमेदवारानेच पक्षाचा ए.बी.फार्म मिळुनही चक्क माघार घेतल्याने महा विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. याचे तीव्र पडसाद राज्यात महा विकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण होण्यात उमटले आहे. तसेच कांग्रेस मधील आतली गटबाजीही या निमित्ताने चव्हाटयावर आली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने कांग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा दिग्गज नेते बाळासाहेब थोरात हे आजारी पडल्याची बातमी असुन त्यांचे हे आजारपण राजकीय तर नव्हे ? अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने विखे व थोरात हे नगर मधील दिग्गज राजकिय हाडवैर असलेले नेतेही एकत्र आल्याचा बोलवा असुन भविष्यात विखे, थोरात, शिंदे असा संपुर्ण नगर जिल्हाच भाजपामय तर होणार नाही ना या ही चर्चेला उधाण आलेले आहे.
तांबे यांची या मतदार संघावर घट्ट अशी पकड आहे. गेली दहा वर्ष त्यांनी हा मतदार संघ बांधलेला असुन पक्षीय राजकारणाच्या पलीकडे वैयक्तीक हितसंबध त्यांनी जोपासलेले आहे. याचा निश्चीत फायदा तांबेना होणार आहे यात शंका नाही.
भाजपने उघड पाठिंबा न देता सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ताकद तांबे यांच्या पाठिशी उभी केली आहे हे उघड सत्य आहे. त्यामुळें या निवडणुकीनंतर राज्यात मोठा भुकंप होईल व याचा तडाखा कांग्रेसला बसेल अशी भाकिते वर्तवली जात आहे. याचा थेट फटका महा विकास आघाडी ला बसण्याची शक्यता आहे.
महा विकास आघाडीने शुभांगी पाटिल या अपक्ष उमेदवारास ऐनप्रसंगी पाठिंबा दिला आहे. मात्र म.वि.आ.मध्येच या ठिकाणी फाटाफुट दिसुन येत आहे तर अनेकानीं पक्षादेश झुगारुन उघड पणे तांबेचा प्रचार केल्याचे आढळले आहे.
एकुणच या लढतीत तांबे हे जड भरतानां दिसत असुन ते बाजी मारतील अशीच चर्चा आहे. दरम्यान या निवडणुकीनंतर कांग्रेस तथा महा विकास आघाडी मध्ये तीव्र राजकीय भुकंप होण्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.