किल्ले विश्रामगड प्रतिनिधी
नगर जिल्ह्याच्या पश्र्चिम सरहद्दीवरील पट्टा किल्ल्याच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ले विश्रामगडाच्या परिसरात १८ ते २० नोहेंबर १६७९ मध्ये तीन दिवस आणि तीन रात्रींचा घना रणसंग्राम शिवछत्रपतींना मोघली फौजेपासून वाचवण्यासाठी झाला. या अंतिम रक्तरंजित लढाईत स्वराज्याचे पंचहजारी सरदार नरवीर सिदोजी नाईक निंबाळकर आणि हजारो मावळ्यांनी आपल्या राजाला वाचवण्यासाठी धारातीर्थी लढता लढता दिलेले बलिदान... या मातीतून उमलणाऱ्या सर्व तरुण पिढ्यांसाठी संस्मरणीय आहे...
याचसाठी रविवार दि.२०/११/२०२२ रोजी विश्रामगडच्या पायथ्याशी (त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूला) नरवीर सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या समाधीजवळ शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र तर्फे ' शौर्यपुजन ' केले जाणार आहे. त्या निमित्ताने किल्ले विश्रामगडच्या या विशेष मोहिमेचे आयोजन केले जात आहे.
तरी परिसरातील सर्व शिवभक्त, राष्ट्रभक्त तरुणांना या धारकऱ्यांच्या वारीत सहभागी होण्याचे आवाहन शिवराष्ट्र तर्फे करण्यात येत आहे.
*संपर्क* -
🚩संतोष शेळके सर. -9405001598.
🚩 प्रा.दिपकराव कर्पे सर -9922678533
🚩डॉ.महादेवजी अरगडे.-9422919151.
अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले विश्रामगड येथे आयोजित करण्यात आलेल्या नरवीर सिदोजी नाईक निंबाळकर व हजारो मावळ्यांच्या बलिदाना निमित्त शौर्य पूजन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व शिवप्रेमी, इतिहास प्रेमी, युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सिदोजी नाईक निंबाळकर यांचे वंशज राजेंद्र सिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.