मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
अनंत चतुर्दशी चे मुहुर्तावर 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा समारोप व गणपतीबाप्पा चे विसर्जन प्रसंगी भक्तांनी बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी व गणेशभक्तांच्या उत्साहाने, प्रचंड गर्दीने दादर परिसर व महाराष्ट्र दणदणून गेला होता, दादरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, माजी उपमहापौर (मुंबई) व भाजपा हॉकर्स युनियन चे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांनी विसर्जनासाठी जाणाऱ्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी भव्य मंच उभारला होता.
त्यावेळी बाबूभाईनी भक्तांना पाणी, प्रसाद, बिस्कीट, चॉकलेट वाटप केले, बाबूभाईचे मंचावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्मा रामदास आठवले, युवा आरपीआय नेता जीत आठवले, खासदार राहुल शेवाळे, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार सदा सरवणकर, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच सर्व जाती धर्माचे हिंदू, दलीत कार्यकर्ते बाबूभाई चे मंचावर उपस्थित होते, त्यावेळी हिंदू दलीत एकतेचे व सर्वधर्म समभाव चे दृष्य दिसले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भवानजी यांचे समाजसेवेचे, जनहिताचे व समाज एकतेच्या कार्याची तोंडभरून कौतुक केले. भवानजी यांनी त्यावेळी सांगितले की देशात सामाजिक एकता वाढविण्यासाठी सर्व जाती जातीत भेदभाव संपला पाहिजे . सर्व हिंदूंनी जातीभेद विसरून एकजूट ठेवण्याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार चांगले कार्य करत असून सर्व हिंदू नी सहकार्य केले पाहिजे.बाबूभाई ने पुढे सांगितले की आपल्या सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तेरा एकर जागा दिली असून स्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे,भवानजी म्हणाले कि बाबासाहब अंबेडकर यांचे स्वप्न होते कि दलित समाजlला सुध्दा केंद्र सरकार मध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, नरेन्द्र मोदी नी रामदास आठवले यांना मंत्रिपद देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे, त्यांनी सांगितले की दलितांचा अपमान सहन करणार नाही, आम्ही सदैव दलितांसोबत आहोत.गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या घोषणा तसेच सेवाकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.