*भाळवणीसह 22 गावाच्या पाणी प्रश्नाकरीता माझी खासदारकी पणाला लावणार - संजय शिंदे*
प्रशांत माळवदे,भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणीसह 22 गावाच्या पाणी प्रश्नासाठी मी माझी खासदारकी पणास लावणार आहे.यापुढे परिसरातील शेतक-यांना पाण्यासाठी बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देणार नाही.असे मत माढा लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
भाळवणी येथील शिवतीर्थावर आयोजित केलेल्या प्रचार सभेच्या वेळी सांगोला विधान सभेचे आमदार गणपतराव देशमुख,राजूबापू पाटील,दिलीप देवकुळे,दिपक पवार,समाधान फाटे,ईस्माईल मुलाणी,भगिरथ भालके,गोरख लिंगे,नवनाथ शिंदे,जयराम शिंदे,संजय बाबर,निहाल शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा सर्व सामान्य शेतक-यांच्या कष्टक-यांचे हित डोळयासमोर ठेवून घेतलेले आहेत.मात्र पाठीत कोणी खंजीर खुपसले ते लवकरच समजेल.फक्त भाजपात गेलेल्या नेत्यांनी आता जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नये.मी काय मिळावे महणून राष्ट्रवादीत परतलो नाही.या भागातील पाण्यासह सर्व प्रश्न सोडविणार आहे.मला एक प्रामाणिक सेवक म्हणून मला सेवेची संधी दयावी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रणजीत जाधव यांनी मानले.