धोंडेवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषिदूतांनी गावातील शेतकऱ्यांसाठी "फुले अमृतकाल" मोबाईल अॅपचा वापर करून पशुपालन व्यवस्थापनावरील प्रात्यक्षिक आयोजित केले.या अॅपव्दारे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचे संगोपन, आहार नियोजन, लसीकरण, उष्णता ताण व्यवस्थापन, तसेच आधारित पशुसंवर्धन सल्ला मिळतो.
अॅप मराठी भाषेत उपलब्ध असून मोफत व वापरण्यास सोपे आहे. अनेक शेतकऱ्यांनी या अॅपद्वारे दूध उत्पादनात वाढ, तसेच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात यश मिळाल्याचे सांगितले.शेतकऱ्यांनी अॅप वापरताना विचारलेले प्रश्न, मार्गदर्शन, आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रभावी पद्धतीने प्रात्यक्षिक सादर केले.हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला असून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग पशुपालन क्षेत्रात वाढवण्याचा सकारात्मक संदेश मिळाला.
या कार्यक्रमात कृषीदूत क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे अविष्कार यांनी सहभाग नोंदवला, या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वय) प्रा. एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा. डी. एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.