भाळवणी प्रतिनिधी
नवमित्र वर्धापन दिनाच्या वतीने दिला जाणारा मानाचा राजकीरण क्षेत्रातील आदर्श सरपंच पुरस्कारासाठी भाळ वणी गावचे सरपंच रणजीत जाधव यांची निवड झाली आहे.
मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी रखुमाई सभागृह शहर पोलिस स्टेसन समोर, पंढरपूर, जि. सोलापूर या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या दैनिक नवमित्र वर्धापन या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवराचे हस्ते आपणास पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करून गौरविण्याचे योजिले आहे.
यावेळी संपादक सचिन माने म्हणाले की आपल्या प्रेरणादायी कार्यामुळे सामाजिक गतिमानतेला वेग प्राप्त होताना दिसतो आहे. आपले हे कार्य आणखी बहरत जावो आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशांना आणखी बळ मिळो यासाठी आपणास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तरी सहकुटुंब आपण हा पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे हि विनंती. दैनिक नवमित्र वर्धापन दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून वैचारिक मंथन व्हावे आणि प्रत्येकाला जीवन जगण्यास आदर्शवादी सामाजिक दिशा प्राप्त व्हावी हा मुख्य हेतू आहे. असे माने म्हणाले.