रत्नागिरी प्रतिनिधी तेज न्यूज
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे आज सकाळी (शनिवार, ८ जून २०२५) एक भीषण अपघात झाला. गॅस टँकर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी बस यांच्यात झालेल्या धडकेत मिनी बस दरीत कोसळली. या अपघातानंतर गॅस टँकरमधून वायू गळती होऊन परिसरातील एक गोठा, एक घर आणि एका रिक्षाला आग लागली. या आगीत एक म्हैस भाजली गेली आहे.
या अपघातात मिनी बसमधील सुमारे २६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलीस पुढील तपास करत आहेत.