पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे, कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारीही असावी लागते म्हणूनच स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासूनच करायला हवी आहे. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केले. ते विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले साहेब उपस्थित होते.
विठाई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात पुढे बोलताना सचिन जगताप म्हणाले, प्रत्येकाला यश मिळवावे असे वाटते परंतु यशस्वी होण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, आत्मविश्वास कमावणे गरजेचे आहे, यश - अपयशाचा विचार न करता पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे, माहितीपेक्षा ज्ञानाला महत्त्व दिले गेले पाहिजे या गोष्टींच्या बळावरच आपण यशस्वी होऊ शकतो. याप्रसंगी बोलताना प्रसाद मिरकले साहेब म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व कितीही असले तरीही स्पर्धा प्रथम स्वतःबरोबरच आपल्याला करावी लागते. दक्षिण भारतातील अनेक राज्ये अशा स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय जीवनापासून तयारी करून घेतात, त्यामुळे येथील युवक व विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होताना दिसून येतात. आपण स्पर्धेत यशस्वी व्हावे असे वाटणे साहजिक आहे परंतु त्यासाठी कष्टाची तयारी हवी.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र ओहोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ.सचिन लादे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षेची गरज व भविष्यात निर्माण होणाऱ्या विवेकानंद स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अरिहंत पब्लिक स्कूलचे संस्थापक सचिव उज्वल दोशी व विठाई संस्थेचे मार्गदर्शन डॉ.आनंद भिंगे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. शेवटी आभार श्रीम. महानंदा डोंबाळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अरिहंत पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम, विद्या विकास मंडळ प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक महादेव कांबळे, ज्ञानेश्वर मोरे, नितीन करंडे, राहुल आर्वे, संजय कुलकर्णी, सुनील जगताप, शहाजी देशमुख, सिद्धार्थ ढवळे, डॉ.क्षितिजा कदम - पाटील, प्रा.गोविंद भोसले, तुकाराम खंदाडे, एकनाथ सुतार, डॉ अतुल आराध्ये, आनंद नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक शशिकांत घाडगे सर, राम मोरे, अनिल घाडगे, ऍड. कीर्ती मोरे, कविता गायकवाड, उदयसिंह वाघमारे, अर्चना वाघमारे, महानंदा डोंबाळे, प्रसाद कोत्तूर, संजय टोणपे, अंजली लादे, माया कुलकर्णी, मोनिका जाधव यांनी परिश्रम घेतले.