आज माझा भारत देश जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असताना... शिवाय जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची लोकशाही असताना..
खरंच या लोकशाहीने या लोकांना समजून घेतले का...? ही तपासण्याची हीच वेळ आहे.
खरा पाहता व्यवसायाचे प्राथमिक व्यवसाय,द्वितीयक व्यवसाय,तृतीयक व्यवसाय,चथुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय असे पाच व्यवसायात वर्गीकरण केले जाते.प्रामुख्याने जे व्यवसाय प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या निसर्गावर अवलंबून असतात त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात.म्हणजेच या व्यवसायात कुशल मनुष्यबळापेक्षा अकुशल मनुष्यबळ जास्त प्रमाणात वापरले जाते.द्वितीयक व्यवसाय म्हणजे जेथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनविण्याचे काम चालते.इथेही दोन्ही प्रकारच्या मजूरांची आवश्यकता असते.पुढील सर्व व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणून ओळखले जाते.त्यामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये व्यापार, दळणवळण,वाहतूक व पर्यटन सारख्या व्यवसायांचा समावेश होतो. चतुर्थक व्यवसाय ज्ञानावर आधारित असतो. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक,वकील व इंजिनियर यांचा समावेश होत असतो. तर पंचक व्यवसाय न्याय व्यवसाय म्हणून ओळखा जातो. अर्थव्यवस्थेच्या उच्च स्तरावर निर्णय घेणारे आणि माहिती आधारित व्यवसाय यांचा समावेश या व्यवसायात होतो. प्रत्येक चतुर्थक आणि पंचक व्यवसायात प्रामुख्याने कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात असते.
परंतु आज घडीला भारत देशाचा विकासाचा वारू कागदोपत्री कितीही दौडत असला तरी या देशात सुमारे ६० ते ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय व त्या व्यवसायाला जोड व्यवसाय असलेल्या व्यवसायात गुंतलेली आहे.आम्ही विकासाचा जरी ढोल वाजवत असलो तरी...खऱ्या विकासापासून लाखो मैल दूर असणाऱ्या लोकांना समजून घेणारा व त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारी मानसं आज ही या विकसनशील भारतात खूप कमी आहेत. भारताचे ७० ते ८० टक्के राजकारणाचा केंद्रबिंदू हेच लोक असतात. प्रामुख्याने लोकशाहीचा राजा निवडताना सेवा व्यवसायातील लोक आपल्याला काय करायचे म्हणून निवडणूक प्रवाहापासून दूर जातात... किंवा देशाच्या विकासाचा विचार करून हे लोक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नाहीत.कारण भारत हा देश स्व विचार करण्यावर भर देतो..हे त्रिकालाबाधित सत्य आहे.हेच डावपेच राजकीय लोकांनी ओळखून.... अकुशल भारत अकुशल कसा राहील यावर भर दिला आहे.
भारत देशात जातीनिहाय जनगणना होणार आहे म्हणे...त्याचे स्वागत सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांनी ही केला आहे.सत्ताधाऱ्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले...या विजयाने काँग्रेस समाधानी झाला आहे.
माझे दोन्ही प्रमुख पक्षांना विनंती आहे की जातीनिहाय जनगणना करीत असताना आधारकार्डला व पॅनला कोणाची किती संपत्ती जोडा.जे जोडणार नाहीत..त्याची संपत्ती जप्त करण्याचा कायदा करा.असे केले तर कर ही मिळेल.. पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही.श्रीमंत India व गरीब भारत ही दरी कमी करण्यासाठी मोलाचा वाटा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन योग्य निर्णय घ्यावा हीच अपेक्षा...
*आजही या देशांमध्ये प्राथमिक व्यवसायाशी संबंधीत लोक,शोषीत,पिडीत, कामगार, कष्टकरी,एकल पिडीत, निराधार लोकांची भयानक अवस्था आहे.भ्रमंती करीत असताना रस्त्याच्या पुलाखाली आसरा घेतलेले लोक पाहून दुःखा अश्रू आवरता येत नाही.*
आज भारत जागतिक स्तरावर किती ही बतावण्या करीत असला तरी वास्तव भारत जगासमोर आणण्याचे धारिष्ट कमी लोकांमध्ये आहे.छुप्या बेकारी चे प्रमाण अगणित आहे.म्हणून शासन बुडत्याला काडीचा आधार म्हणून मोफत योजना जाहीर करून 60 ते 70 टक्के लोकांना लाचार... विवेकशून्य करून निवडणूक जिंकण्याची व्ह्यू रचना आखतात व त्यात यशस्वी होतात.
वरून दिमाखात म्हणायचे लोकांनी आमच्या विकासाला मतदान केले....तसे नसते लोकांचे जिवन मान उंचावू नये यासाठी मोठी काळजी आजपर्यंत राजकीय लोकांनी घेतली आहे.त्यामुळेच ठराविक लोकांनी शिक्षण,आरोग्य, आर्थिक, राजकीय क्षेत्रात आपले प्रस्थ निर्माण करून लोकांना मोफतचे गुंगिचे औषध देऊन 60 टक्के जनतेला डोलायला लावले आहे.
आजही शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी गरीब लोकांनी काडीची किंमत दिली जात नाही...दिलीच तर आर्थिक रसद पुरवठा करावाच लागतो.यालाच बदलता भारत म्हणावा का...? काल परवा IPS झालेला बिरदेव यांने यांचे ज्वलंत उदाहरण दिले मोबाईल हरवला तक्रार द्यायला गेलो तर तेथील व्यवस्थेने शून्य रिस्पॉन्स दिला.यालाच बदलता भारत म्हणावा का..? आजही या देशात राजकीय व शासकीय व्यवस्थेतील लोकांना एखादे काम करायचे असेल तर गिफ्ट द्यावे लागते... यालाच बदलता भारत कसे म्हणावे.
या दोन टक्के लोक अजूनही प्राथमिक व्यवसायातील लोक द्वितीयक व सेवा व्यवसायात जातील यासाठी प्रयत्न करताना व परिवर्तनाचा नारा देताना दिसत नाहीत.यासाठी लोकांनी लोकचळवळ उभी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्याच्या आदर्श घेऊन बदलता भारत उभा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी.
प्रा.आनंदा आलदर ✒️