पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काल जाहीर झाली.यामध्ये पुरुष एस सी वर्ग जाहीर झाला आहे.विद्यमान ग्रामपंचायत मुदत लवकरच संपत असल्याने सरपंच पदाची आशा लागून राहिलेले बलाढ्य धनाढ्य पुढारी गावनेते या सोडतीची वाट पाहत बसले होते.या आरक्षित पदामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सदस्य पंधराच्या यादीत चार सदस्य हे भालके प्रणित विचारांचे घेऊन सत्तेची संधी परिचारक गट प्रणित पांडुरंग परिवाराने संधी दिली होती.पण त्याचवेळी अनेक निष्ठावंत सक्रिय व शिक्षित तरुणांना दूर ठेवल्याने तरुण वर्गात प्रचंड नाराजी होती.त्याचे परिणाम विकास कामावर झालाच. कोणतेही ठोस भरीव कामाची यादी या पाच वर्षात दाखवण्याजोगी या सभासदांकडे नसल्याने अनेक मतदार पश्चाताप करू लागले.
ग्रामसभा वेळेवर न घेणे,घेतलेले निर्णय अमलात न आणणे, विविध योजना कागदी पूर्ण करणे,घरकुल यादीत धनाढ्य व्यक्तींची नावे अशा अनेक तक्रारी मुळे ग्रामपंचायत असून अडचण नसून खोळंबा झाल्याने अनेकांनी विकास हा शब्द विसरून जाणे पसंत केले.
एकीकडे केंद्रात राज्यात एकपक्षीय सत्ता असूनही खर्डीतील विकासाची अवस्था अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती.त्याच त्या पुढाऱ्यांच्या ओंगळवाणे राजकारणामुळे अनेक बांध रस्ते,कोर्ट केसेस,पोलीस केसेस अवैध व्यवसाय बोकाळले आहेत.अतिक्रमण,रस्ते गलिच्छ,वस्ती रस्ते,बस थांबा प्रश्न असो वा चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.अशातच आता नव्याने काही तरुण राजकारणात सक्रिय झाले असून त्यांना डावलून अशिक्षित व्यक्तींना वारंवार संधी दिल्या मुळे लोकसभा व विधान सभेला परिचारक विरोधात मताचा टक्का वाढलेला दिसून आला.आता ही दरी दूर करून नव्याने काही समीकरणे जुळवून घेतली गेली तर पांडुरंग परिवारातील नेत्यांना तालुक्यात बळ मिळू शकते.काळाप्रमाणे बदल केला तर प्रश्न सुटून अनेक योजना गावात आणता येतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
तथापि सोलापूर जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या बलाढ्य परिचारक यांच्या गावातच आरक्षित सरपंच पद झाल्याने नाराज कार्यकर्ते आता त्यातही मतलब साधून फक्त सह्या करणारा उमेदवार शोधू लागले तर नवल वाटू नये.याउलट गावातील तरुण सर्व समावेश असणारा गणेश चंदनशिवे या उमद्या तरुणाचे नाव मात्र सर्व सोशल मीडियावर झळकू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पण खरी रंगत तर आता येणार असाही सूर काही जाणकार राजकीय व्यक्तींच्या बोलण्यातून जाणवू लागला आहे.