पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “ प्रभावी संप्रेषण कौशल्य् ” या विषयावर व्याख्यान संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रा. क्षितिजा ताशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाली. तसेच प्रा. अंजली चांदणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रा. क्षितिजा ताशी यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच सॉफ्ट स्किल अवगत करणे हि काळाची गरज आहे. भरपूर तांत्रिक ज्ञान असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही याचे मूळ कारण विद्यार्थ्यांचे कमकुवत संवाद कौशल्य आहे. प्रत्यक्ष संप्रेषणाबरोबरच अप्रत्यक्ष संप्रेषणही तितकेच महत्वाचे असते. विद्यार्थी कशाप्रकारे स्वतःला इतरांसमोर सादर करतात यावर त्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला नीटनेटके ठेवण्याची सवय लावली पाहिजे. संवाद कौशल्य हे मुलाखतीसाठी सर्वात महत्वाचे असणारे कौशल्य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी करावी. संवाद कौशल्य सुधारताना विद्यार्थ्यांनी निर्माण होणारे अडथळे सुद्धा लक्षात घेऊन त्यावर मात करणे शिकले पाहिजे तसेच स्वतःचे संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा असे मार्गदर्शन प्रा. क्षितिजा ताशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
सदरील कार्यक्रमास प्रथम वर्षातील सुमारे ४०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी अतिशय उर्त्स्फूतपणे प्रतिसाद दिला.
या वेळी कार्यक्रमास कलासाधना सांस्कृतिक मंडळ पंढरपूरचे श्री श्रीकांत बडवे, मुंबई हाय कोर्टाच्या वकील निकिता पवार, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले.