पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील कृषि विद्यालयातील इ. ९ वी मधील विद्यार्थीनी कु. वैष्णवी पांडुरंग गाजरे हिने ग्राम्हणी टॅलेंट हंट राज्यस्तरीय परीक्षेत ९ वी ते १२ वी या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय परीक्षा 23 फेब्रुवारी 2025 ला पार पडली. आपटे उपलप प्रशाला या केंद्रावर ८१ विध्यार्थी तर संपूर्ण राज्यातून ९३३ विध्यार्थी परीक्षेस बसले होते. आपल्या प्रशालेतून ९ विध्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
कु. श्रुष्टी शितल पवार -८८/१०० गुण (राज्यात ६ वा )
कु. ज्योती रामचंद्र पवार- ८६/१००गुण (राज्यात ७ वा )
कु. साक्षी सोमनाथ गाजरे व नंदिनी विजय गाजरे -८४/१०० गुण (राज्यात ८ वा )
कु. सुप्रिया संजय गाजरे व काजल राजेंद्र पवार -८२/१०० गुण (राज्यात ९ वा )
कु. ज्ञानेश्वरी राजेंद्र साळुंखे -७२/१०० गुण (राज्यात १३ वा )
कु. आरती राजेंद्र पवार -७२/१०० गुण (राज्यात १४ वा )
कु. श्रेया प्रदीप गाजरे -६६/१०० गुण (राज्यात १७ वा )
सर्वच विद्यार्थ्यांनी प्रचंड तयारी केलेली दिसून आली अगदी सर्वच 1000 प्रश्न पाठ केले होते पण काही किरकोळ चुका झाल्यामुळे ज्यांचा थोडक्या गुणांनी गुणवत्ता यादीतील नंबर हुकला आहे त्यांनी बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे पुन्हा पुढील वर्षी प्रयत्न करायचा आहे.
या परीक्षेतून आपल्याला काय शिकायचे आहे? भविष्यात हुशार विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांना सामोरे जायचेआहे.आयुष्यात कोणतेच यश व अपयश कायम नसते त्यामुळे एका यशाने हुरळून जायचे नाही व एका अपयशाने खचून जायचे नाही.खरं तर खूप लहान वयात विद्यार्थ्यांना या गोष्टी शिकायला मिळत आहेत.
पुढील वर्षी यश मिळविण्यासाठी तिचे पालक व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.