शिक्षणाचे शस्त्र हाती धरा.....
आज काही कपाळ करंटे लोक सामाजिक स्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यातून संपूर्ण मानवजातीला त्रास सहन करावा लागत आहे.पूर्वी साम्राज्य वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात ढाल तलवारीचा वापर करून धनसंपत्तीची लुटालूट केली जात होती.मनगटशाहीचा व ताकदीचा वापर करून राज्य केले जात होते.इतिहासातील काहीतरी उकरून काढून जनसामान्यांची डोकी भडकवण्याचे काम काही माथेफिरू लोक करीत आहेत.त्याच्यापासून वेळीच सावध राहा.जग हे वेगवेगळ्या ग्रहांचे संशोधन करण्यात मग्न आहे...आमचे काही भडवे भडवे गिरी करून वेगळीच कटकारस्थाने रचण्यात दंग आहेत.सामान्यांनी यांच्या नादाला लागू नये...आपले करिअर व शिक्षण यावर लक्ष केंद्रित करावे.कायद्यानुसार सर्व काही ठीक ठाक चालू असताना काही राक्षसी वृत्तीचे लोक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून एका दगडात अनेक हेतू पूर्ण करण्यासाठी जीव झोकून काम करीत आहेत.त्यापेक्षा देशातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ह्या देशभक्तांना तळमळ का नाही....? त्यासाठी आंदोलन का केले नाही.
मानवी विकास निर्देशांकात Human Development Index मध्ये 191 देशांमध्ये भारताचा 132 वा क्रमांक लागतो.आर्थिक विकासात पहिल्या पाच देशात असणाऱ्या देशाची हीच खरी शोकांतिका आहे.आपला देश शिक्षणावर एकुण उत्पादनाच्या किती टक्के खर्च करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोणताही देश किंवा प्रदेश शिक्षणाशिवाय आर्थिक साक्षर होऊ शकत नाही.जितकी धार्मिक कट्टरता वाढेल तितकाच देशाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास अधोगतीकडे जाईल.त्यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होऊन...देशाला आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागेल.त्यामुळे श्रीमंत श्रीमंत व गरीब गरीब होऊन...काही ठराविक लोक देशावर अधिकार गाजवतील त्यामुळे एकाधिकार वाढून... हुकुमशाही देशात येईल.खरी लोकशाही देशात यायची असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
चीन देश जितके पैसे देशाच्या शैक्षणिक विकासासाठी करतो. त्याच्या निम्मे पैसे जरी आपण खर्च केले तर देशाचा सामाजिक सलोखा वाढीस लागेल.
देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण,पदवी, उच्च पदवी व व्यावसायिक शिक्षण वाढीस तसेच चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्वतः पुढाकार घेऊन सरकार भरोसे न राहता आर्थिक मदत करून शाळा व काॅलेजला आवश्यक शैक्षणिक साहित्य दान करावेत.मंदिर, मशिदी, चर्च व इतर धार्मिक स्थळांना दान करून ठराविक लोकांची आर्थिक स्थिती व कोथळे सुधारण्यापेक्षा शाळांना दान केले तर खरे देशभक्त आपण ठरू.... त्यातून लोकांची मस्तक सुधारली जातील... कोणाचेही हस्तक न बनता स्वतः चे शैक्षणिक दस्त मजबूत बनवा.शैक्षणिक शस्त्र धारधार करून ठेवा.तरच देशाचा विकास भरधाव वेगाने धावेल.
आनंदा आलदर ✒️ 9765066247