पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सर्वसामान्य रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर येथे संस्थापक - सचिवा सौ.सनेत्राताई विजयसिंह पवार यांचे शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर बोलतानाही सुनेत्राताई पवार म्हणाल्या की छत्रपतींचे शौर्य अतुलनीय असे होते.त्यांचे नेतृत्व हे दूरदृष्टीमय होते. न्यायी राजा म्हणून त्यांची विशेष ओळख होती. तर गोरगरिबांसाठी आणि कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या. त्यांनी फक्त शक्तिशाली मराठा साम्राज्य स्थापन केले नाही. तर संस्कृती व स्वाभिमान देखील जिवंत ठेवला असे सांगितले. जेष्ठ शिक्षिका विभावरी डुबल. यांनी आपले मनोगतात छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना म्हणाल्या की छत्रपती शिवरायांचे खरे धर्मगुरू संत तुकाराम महाराज हे असुन त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वतंत्र स्वराज्याचा पाया रचला आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासूनच धर्म नैतिकता व शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्य दिली. शिवराय फक्त शूर यौद्धे नसून ते थोर समाज सुधारक होते. असे सांगितले शिवरायांच्या आदर्शा मधून आपण सर्वानी प्रेरणा घेऊन त्यांचे विचार, नेतृत्व सार्वजनिक सेवा, न्यायासाठी असणारी वचनबद्धता आत्मसात करून आपल्या दैनंदिन जीवनमूल्यात बदल करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
तसेच सुरज चव्हाण, उमाक्का पाटील. या मुलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर कल्याणी जगताप, साईराज देशमुख यांनी लाठीकाठी व पोवाडा गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून सर्वत्र वातावरण शिवमय करून टाकले.
कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता लोखंडे यांनी केले. तर आभार माधुरी बोडके यांनी माणले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे शुभहस्ते मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत कोष्टी, विजय भंडारे, पुंजाजी ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.