सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब हे अकरा वेळा विधानसभेला निवडुन आले होते. त्यांच्या नावाची नोंद गिनीज वर्ड आॕफ रेकाॅर्ड मध्ये झाली आहे...एवढ्या प्रदिर्घकाळ आमदार असुनही त्यांनी साधे राहणीमान व उच्च विचार जोपासले त्यांनी कदीही मोठेपणा केला नाही की थाटमाट केला नाही. सामांन्य नागरीका प्रमाणेच ते वावरत असत वागत आसत.लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता पंन्नास पंचावन्न वर्षे निस्वार्थपणे जनतेची सेवा त्यांनी केली..
स्व आबासाहेबांच्या प्रमाणेच नवीन निवडुन आलेले आपले लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे सुध्दा आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत जनसेवा करीत आहेत याची प्रचिती जनतेला रोज येत आहे. डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे विधानसभेला निवडुन येण्या अगोदर गेले अनेक दिवस ते जनसंपर्क ठेऊन होते..सांगोला विधानसभा मतदार संघातील व ईतर तालुक्यातील कोणताही कार्यक्रम असो की समारंभ असो ते जातीने उपस्थिती लावत असत. कुठलाही सुख दुःखाचा प्रसंग असो ते त्यांच्या सुख दु:खात सहभागी होत असत ..परीणामी त्यांचा एवढा जनसंपर्क निर्माण झाला की मतदार संघातील प्रत्येक गावात वाड्या वस्तीवरील अनेकांना ते नावानिशी ओळखु लागले...फक्त संपर्कच नव्हे तर
कित्येकांची कामे सोडवण्यासाठी बाबासाहेब प्रयत्न करु लागले.शेतकऱ्यांच्या समस्यावर लोकशाही मार्गाने आंदोलने केली.विद्यार्थांच्या समस्या सोडवल्या. रोज लोकांची गाऱ्हाणी ऐकुन त्यावर उपाय योजना करण्याचा प्रयत्न करु लागले.परीणामी डाॅ.भाई बाबासाहेब देशमुखांची जनमानसात उत्तम कार्यकुशल युवा नेता अशी छबी निर्माण झाली.व बाबासाहेब देशमुखांची लोकप्रियता एवढी वाढली की सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेने त्यांना भरघोस आशा मतांनी आमदार म्हणुन निवडुन देऊन विश्वास व्यक्त केला.
भले ही स्व आबासाहेबांची बरोबरी कोणीही करु शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे. तरीही आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांचे आचार-विचार आत्मसात करुन
आबासाहेबाप्रमाणेच निस्वार्थ पणे जनसेवा करताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेतल्यापासुन आतापर्यत आमदार बाबासाहेब देशमुख साहेब हे जनसंपर्क वाढवण्यासाठी अजुनही प्रयत्नशिल आहेत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. आजही आमदार बाबासाहेब देशमुख हे सार्वजनीक-वयक्तीक कार्यक्रमात सहभागी होत आहेत..कुठल्याही सुख-दुःखाच्या प्रसंगी सहभाग नोंदवुन सुख-दुःखात सामील होत आहेत.
स्व आबासाहेब कदीही आमदार असल्याचा बडेजाव करीत नव्हते तसेच वर्तन लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांचे आज आत्ताही पहावयास मिळत आहे.. सर्वसामांन्य नागरीकाप्रमाणेच वावरणे आपण फक्त जनतेचे सेवक आहोत याची जाणीव मनामध्ये ठेऊनच आमदार बाबासाहेब देशमुख सुध्दा निस्वार्थ पणे जनसेवा करीत आहेत. स्व आबासाहेबांनी सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थिती करुन ते सोडवले होते. आबासाहेब सभागृहामध्ये बोलताना आभ्यासपुर्ण मांडणी करायचे ते बोलण्यासाठी उभे राहीले व त्यांचा खणखणीत आवाज कानावरती आला, की...सभागृह शांत होऊन आबासाहेबांना ऐंकत असतं त्याचीच आठवण.. तशीच मांडणी..तसाच आवाज...तसाच आभ्यास नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहावयास मिळाला..
आमदार म्हणुन जबाबदारी स्विकारल्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी मतदार संघात शांतता प्रस्थापित करण्यावरती भर दिला आहे.समाजा-समाजामध्ये
बंधु भावाची भावना वाढीस लागण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.विशेषता नागरीकांच्या आरोग्याच्या व शिक्षणाच्या प्रश्नावरती आमदार बाबासाहेब देशमुख हे विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.
विकास म्हणजे फक्त सिमेंटचे रस्ते व सिमेंटच्या बिल्डिंगा तयार झाल्या कि, विकास झाला आसे बिल्कुल नसते ...विकास हा सर्व आंगाणी झाला पाहीजे. विकासाचा लाभ तळागाळापर्यंत गेला पाहीजे.विशेषता तरुणांच्या समस्या सोडवणे,महिलांच्या प्रश्नांना प्राधांन्य देऊन ते सोडवणे,सामाजीक समतोल राखणे,विजेचे प्रश्न ,शेतीचे व पिण्याचे पाणी,या प्रश्नाकडे गांभिर्याने बघुन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. या व आशा अनेक गोष्टिंचा सर्वागीण विकासामध्ये समावेश होत आसतो...आसा सर्वांगीण विकास स्व आबासाहेबांनी साधला होता तोच विकास साधण्यासाठी लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे प्रयत्न करताना दिसत आहेत.काल परवा सांगोला बचत भवन येथे सरपंच व अधिकारी वर्ग यांची बैठक झाली.त्या बैठकीमध्ये आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले उदाहरण द्यायचे झाल्यास टेंभु योजनेच्या अधिकाऱ्यांना टेंभुचे आवर्तन सोडणे कसे गरजेचे आहे ते सांगीतले व पाणी तात्काळ सोडण्याच्या सुचना केल्या परीणामी अधीकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवत पाणी सोडले सध्या ते पाणी गळवेवाडी बंधारा,आवळाई बंधारा विठलापुर येथील दोन बंधारे भरुन काही दिवसात खवासपुर व लोटेवाडी भागासाठी येणार आहे.
सध्या ते पाणी निंबवडेच्या पुढे आले आहे.आसे अनेक प्रश्न मार्गी लावले गेले आहेत स्व.आबासाहेबांच्या कामाच्या पध्दतीची झलक आमदार बाबासाहेबांच्या कामात दिसत आहे तोच वसा व वारसा येणाऱ्या काळात आमदार बाबासाहेब देशमुख चालवत आहेत कारण निस्वार्थीपणे सर्वांगीण विकास करणे ही शेकापक्षाची परंपरा आहे.