पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यांमध्ये ४ ते ५ बिबट्याचा मुक्त संचार असून शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या दोन तीन वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव,उपरी,पळशी,गादेगाव ,सुस्ते,चळे,आंबे,सरकोली,पोहोरगाव,ओझेवाडी,पुळुज, भाळवणी इत्यादी गावातील जनावरांवर हल्ले केले आहेत वेळोवेळी सदर हल्ले बिबट्याने केले आहेत,है प्रत्यक्ष दर्शी शेतकर्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक वेळा पत्र व्यवहार करून ही वन विभागाचे अधिकाऱ्यांनी तो बिबट्या नसून तो तरस आहे असे सांगून शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल केली व शेतकर्यांना खोटे ठरवले आहे.
परंतु काल झालेल्या अपघातांमधून पंढरपूर तालुक्यात बिबट्या चा संचार आहे हे सिद्ध झाले आहे,वनविभागाचा रामभरोसे कारभार चव्हाट्यावर आला असून,त्यात बिबट्या मयत झाला असून,दोन बिबट्या तिथून पळ काढला आहे त्यामुळे शेतात रात्री,अपरात्री काम करणारे शेतकरी,शेत मंजूर, दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
ज्या भागात बिबट्या चार वावर आहे त्या भागात वन विभागाच्या वतीने दवंडी, बैठक, गावभेट, घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा व तात्काळ बिबट्यांना जेरबंद करून त्यांच्या अधिवासात सोडावे.अर्वरित बिबट्या कडूनही माणसावर हल्ला होऊ शकतो,त्या अगोदर वनविभागाने खबरदारी घ्यावी .