जीवनातील सर्व सुखाचे उगमस्थान पंढरीच्या पांडुरंगा चरणी आहे:- ह.भ.प.प्रशांत पांडव
मनुष्याचे जीवन सुख आणि दुःखानी भरलेले असले तरी ते सुख आणि दुःख कायम राहत नाही.
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तनाच्या द्वितीय पुष्पा मध्ये ख्यातनाम कीर्तनकार प्रशांत बुवा पांडव यांनी सांगितले.
सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीपप्रज्वलन प्रशांत बुवा पांडव आणि करकंब मधील पत्रकार बांधव त्यामध्ये लक्ष्मण शिंदे, ऋषिकेश वाघमारे, सचिन शिंदे, लक्ष्मण जाधव, राजेंद्र करपे, सुनील कोरके, गोपीनाथ देशमुख, सारांश थिटे, रोहन नरसाळे, नितीन खाडे, बाळासाहेब काशिद तसेच बाळासाहेब वास्ते प्रभाकर टेके आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येऊन पत्रकार दिनाचे औचित्य साधून करकंब मधील सर्व पत्रकार बंधूंचा मानाचा फेटा आणि देवीच वस्त्र देऊन श्री चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली.पूर्वरंगामध्ये प्रशांत बुवा पांडव यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा अवघाची संसार सुखाचा करीन या सुंदर अभंगावर निरुपण करताना सांगितले की मनुष्य हा जीवन जगत असताना सुखा नंतर दुःख येते दुःखा नंतर सुख येते जीवनात सर्व सुखी असा कोणी ही नाही.त्यामुळे जीवनात अनंत कायम स्वरुपी सुख प्राप्त करायचं असल्यास संतांनी दाखवलेल्या मार्गावर जात सर्वांचं माहेर असलेल्या पंढरपूरीचा विठूरायाच्या चरणी मनोभावे नतमस्तक झाला तर मागेपुढे उभा राहणे सांभाळीत आली या आघात निवाराया या भुमिकेतून तो सर्वांचा संभाळ करतो कसलाही भेदभाव न करता त्यासाठी फक्त आपला भाव मात्र शुध्द पाहिजे.मनुष्याला जीवन जगत असताना संसार जरी सुटत नसला तरी त्या संसारतील सर्व कामे कर्म करीत असताना भगवंताचे नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे.मनुष्याचे जीवनात पैसा.मानसन्मान.प्रेमकरणारी पत्नी.ऐकणारा मुलगा.उत्तम आरोग्य.आणि जन्ममरणाच दुःख यासाठीच जीवन जगत असला तरी या सर्व गोष्टी सर्वांकडे असतीलच असं सांगता येत नाही.मनुष्य मरेपर्यंत काहींना काही गोष्टी मुळं दुःखी असतोच.त्यासाठी नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे त्यानंतर उत्तररंगामध्ये महाभारतातील भिष्माचार्य यांचे आख्यान सांगताना त्यांच्या जीवनातील सुखदुःखाच्या गोष्टी सांगत पाठीराखा श्रीकृष्ण असला की सर्व सुखदुःख कशी नाहीशी होतात यावर अनेक दृष्टांत देत करकंबकर कलारसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.ख्यातनाम तबलावादक असले तरी लहानपणापासून घरात कीर्तनाची परंपरा संस्कार झाल्यामुळे कीर्तन आणि गायन ही तितकच तयारीचे असल्याचे दिसून आले.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम गंगाधर देव टाळ माऊली पिसे आणि गायनसाथ प्रभाकर पांडव यांनी करत कीर्तनाला अधिक रंग भरला.दुपारी महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी पाककला स्पर्धा आणि झटपट स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेत ही महिलांचा सुंदर प्रतिसाद मिळाला पाककलेचे परीक्षण अपूर्वा थिटे आणि राहुल शिलवंत यांनी केले.
यावेळी करकंबकरांनी उत्तम प्रतिसाद देत चौंडेश्वरी पौष पौर्णिमा महोत्सवाची रंगत वाढवत आहेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधव अधिक परिश्रम घेत आहेत.