भिकारी मनाच्या बाया व बापय...!
महाराष्ट्रात शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली.ती योग्य की अयोग्य यांच्या पलिकडे खूप काही दडलेले आहे.ही योजना भूमिहीन,मजूर, राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला,शेतमजूर व हातावर पोट असणाऱ्यांना थोडीफार लाभदायक ठरू शकते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै 2024 पासून *माझी लाडकी बहिण योजना* सुरू झाली.परंतु ही योजना सुरू करण्याचा शिंदे साहेबांचा मानस वेगळा होता. त्यांनी महाराष्ट्रातील वय 21 ते 65 मधील गरीब व निराधार महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले.
ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
वरील सर्व नियम धाब्यावर बसवून काहींनी वय वाढवून तर काहींनी वय कमी करून 1500 रूपये मिळवण्यासाठी जीवाचे रान केले.परंतू शासनाने अशी पैशाची खिरापत वाटणे योग्य आहे का..? या योजनेचा लाभ खोटे पणा करून ज्यांनी ज्यांनी उठवला त्यांच्या योग्यवर कारवाई शासनाने करावी.
आज कोणतीही शासकीय योजना आली रे आली की भिकारी मनाची श्रीमंत माणसे पहिल्या रांगेत पाहायला मिळतात.तेव्हा या लोकांना श्रीमंतीची लाज वाटत नाही का..?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ ज्या भिकारी मनाच्या श्रीमंत बयांनी घेतला त्या दररोज कटोरा घेऊन गल्ली बोळात फिरल्या असत्या तर दिवसांचे 50 पकडले तर 1500 रूपये सहज मिळवता आले असते.
भिकारी मनाच्या श्रीमंत बया व बापय 1500 रूपये आले की आत्मसन्मान गहाण ठेवून पैशासाठी लोभी झालेले पाहून...रांगेत उभे राहते वेळी खरंच यांचे मन खजील होत नसेल का...?
*या योजनेचा लाभ ज्यांनी ज्यांनी घेतला . त्यांना गरीब म्हटले तर मनाले किती झोंबेल..* परंतु हे लापाट म्हणतील शासनाला सोडून काय आलं....! 1500 रूपया वर डल्ला मारत असताना यांना काही वाटत नसेल का..? बंगल्यात राहणाऱ्या बया ,चार चाकी मध्ये मनमुराद आनंद घेणाऱ्या व लाखोंची उलाढाल असलेले बया व बापय या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप धडपडले व ही योजना पदरात पाडून घेतली ही...
माझे सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांना कळकळीची विनंती आहे भिकारी मनाच्या श्रीमंत बया व बापयांना धडा नाही शिकवला तर खरे हक्कदार बाजूलाच राहतील.अनेक हक्कदार कागदपत्रे नसल्या कारणाने व कागदपत्राची माहीतच नसणारे अनेक हक्क दार बहिणी या योजनेपासून वंचित आहेत.त्यांना या योजनेचा फायदा मिळावा म्हणून स्वयंसेवकांची फळी निर्माण करून योग्य अश्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.
नाही तर भिकारी मनाच्या श्रीमंत बया व बापय या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जातील. यात सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळावा.
प्रा.आनंदा आलदर ✒️
9765066247