पैशासाठी मुडदे पडतात तेव्हा....!
आज सद्यस्थितीत ग्रामीण भाग असो या शहरी भाग या ठिकाणी मुडदे पडायला सुरुवात झाली आहे.मुडद्यावरचे लोणी खाणारी मंडळी हळूहळू वाढू लागली तसं तशी मुडद्यांची संख्या वाढू लागली आहे.
याला प्रमुख कारण आहे वर्चस्व वादाची लढाई... लोकांना तर पैसा म्हणजे सर्वस्व वाटू लागले आहे.आमचे साहित्यिक अशा घटना वर ब्र काढण्यास तयार नाहीत.मिडियावाले झालेल्या गोष्टींच्या मुळाशी न जाता तुम्हाला काय वाटते...हे विचारण्यात धन्यता मानू लागले आहेत...नको त्या व्यक्तीला फोकस करून टी.आर.पी. वाढवून धंदा तेजीत ठेवण्याचे काम करत आहेत.बाप मेला तर आपली मिशी शाबूत ठेवण्यासाठी सध्याची मिडिया धडपडत आहेत.
राजकारण सध्या पैश्याच्या भोवती घिरट्या घालू लागले आहे.छोटी माणसं चिरीमिरीत गुंतले आहेत...मोठे मासे खोक्यात गुंतलेले आहेत.
ग्रामीण भागातील राजकारण अवैध व्यवसाय,सट्टा, मटका,वाळू माफिया,दो नंबरचे नको ते व्यवसाय....तर शहरी भागातील राजकारण अमली पदार्थ, भुखंड माफिया, बिल्डर व भाईगिरी यांच्या भोवतीच पिंगा घालू लागले आहेत...याला आशीर्वाद कोणाचे मिळतात हे आपण जाणूनच आहोत.प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे यांच्या विरुद्ध लढाई करणारे समाजसुधारक ही पावसाळ्यातील छत्री सारखे आहेत.ते ही राजकीय लोकांच्या हातातील बाहुले झाले आहेत.सत्ता आली की एखादा पुरस्कार देऊन तोंड कायमचे बंद करायचे किंवा राजकीय खेळी साठी समाजसुधारक व साहित्यिक म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे.....
मुडदे पाडणारे आहेत व पडणारे आहेत तर कोण...? हे कश्यासाठी साठी एकमेकांच्या जीवाशी खेळत आहेत...? हा तर कळीचा मुद्दा आहे.....कधी कधी प्रश्न पडतो एवढे स्वस्त झाले आहे का मरण...आज जे नरडीचा घोट घेणारी मुलं पाहिली तर साधारणपणे 15 ते 35 या वयोगटातील दिसत आहेत.खर पाहता हाच वयोगट देशाची दशा व दिशा बदलू शकतो..पण याच वयोगटातील मुलांच्या हातात नशा व मस्ती आली तर महाराष्ट्राने अशा कोणावर ठेवायची... राजकीय लोकांनी याच वयोगटातील मुलांना टार्गेट करून यांना सर्व प्रकारच्या गोष्टी पुरवण्यास सुरवात केली आहे.त्या माध्यमातून साम,दाम दंड व भेद या नितीचा वापर करून नियत बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
गेल्या पाच दहा वर्षांतील राजकीय लोकांनी तर भाषेची पातळी सोडली आहे.कोणत्याही प्रकारचा कामधंदा न करता आरोप प्रत्यारोप करत बसून..लोकांची डोकी बधीर करून राजकीय धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी करू लागले आहे.
15 ते 35 या वयोगटातील तरूण मुले बेरोजगार म्हणून भटकत आहेत.याला सर्वस्वी जबाबदार येथील यंत्रणा आहे.अनेक बेरोजगार मुले... रोजगार नाही.. शिवाय मुली मिळत नाहीत... यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन कमी कालावधीत संपवू लागलेले आहेत.याचा फायदा राजकीय धुरंधर घेऊ लागले आहेत... आपल्या राजकीय वर्चस्वासाठी या वयोगटातील मुलांचा वापर होऊ लागला आहे.
त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे... कोणी म्हणत महाराष्ट्राचा बिहार झाला...तो का झाला...यावर चर्चा करायला कोणी तयार नाही. लोक एक ते दोन दिवसांत व काही ठराविक वर्षात निच्चतम पातळीवर जात नसतात....सर्व पर्याय खुटतात तेव्हा.... माणूस वेगळ्या मार्गाचा विचार करतो...
आज हे मृत्यू तांडव महाराष्ट्रात घडत आहेत...हे राजकीय लोकांनी पेरलेले पीक आहे....हे पिक बहरण्याच्या अगोदरच याचा खुडा करणे गरजेचे आहे.
डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या,दलित हत्याकांड, गेल्या वर्षी समाजसेवक हेरंब कुलकर्णी सर यांच्यावर भ्याड हल्ला झाला....त्या त्या वेळच्या राजकीय लोकांनी योग्य पावले उचलली असती तर... पुरोगामी महाराष्ट्रात मृत्यू स्वस्त झाला नसता...
प्रा.आनंदा आलदर ✒️
9765066247