मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
करोनाकाळातील आर्थिक परिस्थिती मुळे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य उध्वस्त केल्याचा गंभीर प्रकार ठाणे घोडबंदर येथील श्री माॅं विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिनी नायर यांनी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे, पालक प्रशांत कवळे यांची करोनाकाळात आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते आपल्या मूलाचे शुल्क भरु शकले नाही म्हणून त्यांच्या मुलाला शाळेनी अपमानास्पद वागणूक तर दिलीच पण पालकांनी विनवण्या करून देखील विद्यार्थ्यांला सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सिबिएसई ची १० विची परिक्षा न देता त्याला ९ विला फेल दाखवुन दिल्ली येथील एन. आय. ओ. एस मुक्त विद्यापीठातून परिक्षा द्यायला भाग पाडले व त्यातुनही पास झाल्यावर आजतगायत विद्यार्थ्याचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला शाळेने रोखल्या मुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला पण शाळे कडे मागितला जेणे करुन त्यांचा मुलगा फाॅर्म १७ भरुन बाहेरून सिबिएसई परिक्षा देऊ शकला असता पण त्याला हि शाळेने नकार दिला, निराश पालकाने अखेर *महाराष्ट्र राज्य विद्यार्थी शिक्षक पालक संघाचे नितीन दळवी यांच्या समोर प्रकार मांडल्यावर आज मा. अध्यक्षा बालहक्क संरक्षण आयोग व शालेय शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली व शाळा मुख्याध्यापिका मिनी नायर व शाळा प्रशासनावर विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य उधवस्त करणे व त्याला मानसिक त्रास दिल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करणाची मागणी करण्यात आली.
श्री माॅं विद्यालय सिबिएसई यांनी केलेला प्रकार हा अमानुष असल्याचे नितीन दळवी यांचे म्हणणे आहे, विद्यार्थ्यांचे शिक्षण १ ली ते १० वी पर्यंत सिबिएसई अभ्यासक्रमात झाले असताना केवळ शुलक न भरल्यामुळे विद्यार्थ्याला ९ वि फेल दाखवुन मुक्त विद्यापीठातुन परिक्षा द्याला लावले, वरती उत्तीर्ण झाल्यावर त्याचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला रोखल्या मुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया घालवले,विद्यार्थ्याला पुढिल शिक्षण हे विज्ञान शाखेत घ्यायचे होते पण आता मुक्त विद्यापीठातुन १० वि उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला कॉमर्स किंवा आर्ट्स या शाखेमध्येच प्रवेश घेतल्या शिवाय पर्याय नाही, या प्रकाराने विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य उध्वस्त करण्याचे काम शाळेने केले, विद्यार्थ्यांला शाळा सोडल्याचा दाखला नाकारण्यात आला जेणे करून त्याला फाॅर्म १७ भरुन बाहेरुन सिबिएसई ची परीक्षा बाहेरुन देऊ शकेल, अशा पद्धतीने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याची सर्व बाजुने कोंडी या शाळेने केली, हा प्रकार अमानवी आहे, या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याला जबर मानसिक धक्का बसलाय व तो नैराश्यात गेला आहे, यातुन बाहेर पडणे विद्यार्थ्याला कठीण होऊन बसले आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिके वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन दळवी यांनी तक्रारी द्वारे केली आहे.
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत असे बरेच प्रकार गेले काही वर्षे घडत आहेत पण बालहक्क आयोगाने आदेश देऊनही उपसंचालक व शिक्षण निरीक्षक यांनी आजतागायत एकाही शाळेवर ठोस कारवाई केली नाही व पाठीशी घातले आहे आणि म्हणूनच या शाळा बिनधास्तपणे असा प्रकार करतात, म्हणून नितीन दळवी यांनी प्रधान सचिव शालेय शिक्षण यांना अशा सर्व प्रकारातील शाळांवर कारवाई एक महिन्याच्या आत पुर्ण करा अन्यथा मा. न्यायालयात या असा इशारा तक्रारी द्वारे दिला आहे.