आष्टी उपसा सिंचन योजनेमधून शेख वस्ती व लोहार तलावात पाणी सोडण्याची मागणी
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज नेताजी शिंदे
आष्टी उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोनच्या कॅनॉल मधून ज्या वेळेस पाण्याचे आवर्तन सोडले जाते. त्या वेळेस शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून त्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होते. तर ७० टक्के पाण्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने तेलंगवाडी, खंडाळी, पापरी, कोन्हेरी, पेनूर व पाटकुल आदी परिसरातील कॅनॉलचे काँक्रीटकरण करण्यात यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चरणराज चवरे यांनी केली.
जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या या मागणीनुसार दि.०४ रोजी सकाळी आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन मधून पोखरापूर पाईपलाईनचा मुद्दा आणि त्याचबरोबर लोहार पाझर तलाव, शेख वस्ती पाझर तलावाची पाहणी करण्यात आली व आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलला पाणी सोडण्याबाबत पंचक्रोशीतील शेतकरी तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेचे प्रमुख अधिकारी नारायण जोशी तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे व पंचक्रोस्तीतील शेतकरी तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शेतकरी आणि उपसा सिंचन योजनेचे अधिकारी यामध्ये सखोल चर्चा झाली आणि सर्व मुद्द्यांचे समाधानकारक चर्चा करण्यात आली.प्रामुख्याने आष्टी उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोन पोखरापूर या योजनेच्या पाणी सोडण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व त्याचबरोबर प्रामुख्याने आष्टी उपसा सिंचन योजना संपूर्ण रित्या कॉंक्रिटीकरण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कसे कमी होईल यासंदर्भात मुख्य चर्चा करण्यात आली व शेख वस्ती पाझर तलावामध्ये पाणी सोडणे लोहार पाझर तलावामध्ये पाणी सोडणे व त्या कामाच्या मंजुरीसाठी आष्टी उपसा सिंचन योजनेचे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव बनवून देण्याचे वचन दिले व त्याचा पाठपुरावा करण्याचे जबाबदारी जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांनी घेतली.
यावेळी लवकरात लवकर या दोन्ही तलावामध्ये पाणी आणण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आणि मुख्यता आष्टी उपसा सिंचन योजनेचा कॅनॉलमध्ये लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्याला लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आली.