वेणुनगर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार मा. श्री अभिजीत (आबा) पाटीलसाहेब यांनी माढा विधानसभा मतदार संघातून संस्मरणीय विजय संपादन केल्याबद्दल कारखान्याच्या वतीने सत्कार सोहळा रविवार दि.२९.१२.२०२४ रोजी संपन्न झाला.
सदर प्रसंगी सत्कारास उत्तर देताना अभिजीत आबा पाटील म्हणाले की, कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाच्या भुमीपुजन प्रसंगी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले होते की, चेअरमन अभिजीत पाटील हे लोकांनी तयार केलेले नेतृत्व असून त्यास आम्ही संधी देवू, श्री विठ्ठल कारखान्यास पुर्नजीवन मिळावे या हेतूने कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाग घेतेवेळी कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. मात्र नवनवीन संवंगडी जोडुन निवडणुकीत यश संपादन करुन कारखाना यशस्वीरित्या चालविल्यामुळे जनमानसांमध्ये विश्वास संपादित करता आला. त्यामुळे सर्वांच्या सोबतीने सर्वांनी पडल ती जबाबदारी स्विकारून रात्रीचा दिवस करून अवघ्या तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापितांच्या विरुध्द प्रचंड बहुमताने विजय मिळवता आला. त्यामुळेच विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये ५५ विषयांवर मांडणी करुन आवाज उठविला, यातुन बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लागतील. त्यामध्ये मुख्यत्वे करून उजनी धरणावरील अॅग्रो टयुरीझम प्रकल्प, मेंढापूर येथील एमआयडीसी प्रकल्प, मादा शहर व विविध गावांमधील प्रलंबित असलेले पिण्याचे पाण्याचे प्रश्न, साखर कारखान्यांशी निगडीत एमएसपी व इतर विकास कामे.
लोकांची सेवा करता यावी दृष्टीने राज्य शासनाच्या आरोग्य समितीमध्ये सदस्य म्हणून निवड व्हावी अशी मागणी केली असता माझी त्या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याचा सर्व सामान्य नागरिकांना लाभ मिळेल. प्रसंगी राज्य शासनाच्या सोलार ऊर्जा पंप या योजनेचा माझ्या शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत असणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा त्यास निधी कमी पडु दिला जाणार नाही, असे आवाहन केले.
आपले कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ सुरु असून मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस गाळपाविना राहू नये अशा सुचना शेती विभागास केल्या. तसेच पुढील वर्षी कारखाना अधिकाधिक क्षमतेने गाळप करणार असून २० लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
आमदार होणेसाठी निवडणुकीमध्ये झटलेल्या प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्ती, कर्मचारी, सभासद, सर्व संस्थांचे संचालक मंडळ यांचे शतशः आभार मानून आपण दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्के सर यांना नालंदा फौंडेशन, बीड आयोजित शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय व्दितीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करणेत आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड यांनी केले. तर कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील, ब्रम्हदेव चव्हाण, आण्णा हजारे, महादेव तळेकर, संजय पाटील सर यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिगल ऑफीसर अवधुत यांनी केले व कारखान्याचे संजय घुले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रीत संचालक धनाजी खरात, सचिन पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, एम. एस.सी. बँकेचे स्थायी तपासणी अधिकारी सी.एस. पाटील तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग, कार्यकर्ते, सभासद, कंत्राटदार, व्यापारी व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.