नववर्ष साजरे करताना
हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्याला सुरू होते त्यामुळे डिसेंबर नंतर येणारा जानेवारी हा महिना म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला दिवस आता त्याचा आनंद साजरा करायचा की नाही याविषयी आपल्याकडे बऱ्याच चर्चा होत असतात त्या फक्त नवीन वर्षाबद्दलच मर्यादित नसून अनेक सणावारांपासून तर अगदी वाढदिवस साजरे करायचे की नाही याबद्दल देखील कायम होत असतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की जर जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, वाढदिवस साजरा करणे ही आपली पद्धत नाही,अनेक असे सण उत्सव आहेत जी साजरे करणे आपल्या हिंदू धर्माला मान्य नाही, मग यांची सुरुवात झाली तरी कुठून, अगदी लहानपणापासून मराठी शाळेत शिक्षण घेत असताना देखील दरवर्षी Happy New year हे शब्द आमच्या कानावर टाकले कुणी,, 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी फिक्स असते,, नवीन वर्ष म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी अनेक जाहिराती लावल्या जातात डिस्काउंटच्या,, बऱ्याच वस्तूवर सूट देखील दिली जाते नवीन वर्षाच्या निमित्ताने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा न देणारे देखील या ऑफर्सची आतुरतेने वाट बघत असतात अगदी छोट्या छोट्या गल्लीपासून तर दिल्लीच्या मोठ्या मोठ्या फाइव स्टार हॉटेल पूर्णपणे बुक झालेले असतात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी,,अनेक शाळा कॉलेज यांच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सहली आयोजित केल्या जातात घरातील लहान मुलांपासून तर अगदी प्रौढ व्यक्ती पर्यंत सगळ्यांचे प्लॅनिंग ठरलेले असतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी. पूर्वी तर फोन आणि सोशल मीडिया इतका जास्त नव्हता त्यामुळे फक्त ग्रीटिंग कार्ड्स किंवा हाताने बनवलेले सुंदर डिझाईनचे कार्ड वगैरे आम्हाला माहिती होते मात्र आता या लॅपटॉप आणि फोन च्या माध्यमाने नवीन वर्षासाठी विविध प्रकारचे मेसेजेस सहजतेने उपलब्ध असतात.फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील नवीन वर्ष साजरे करताना टाकले जाणारे मेसेजेस, नवीन वर्षाच्या प्लॅनिंग्स,सर्व सहजपणे शेअर होत असते अगदी नवीन वर्षासाठी केलेली शॉपिंग पासून तर सेलिब्रेशन पर्यंत कोणालाच कोणताच प्रश्न पडत नाही प्रश्न पडतो तो फक्त की जानेवारी महिन्याचा पहिला दिवस हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा करायचा की नाही. बऱ्याच लोकांना नैसर्गिकदृष्ट्याने पाहताना डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हणजे वृक्षांची झालेली पानगळ,, तापमानात प्रचंड प्रमाणात झालेली घट म्हणजे कडाक्याची थंडी,, अशा निरस झालेल्या वातावरणामध्ये नवीन वर्ष कसा काय येऊ शकतो..?हा देखील प्रश्न पडतो. अशा एक न अनेक प्रश्नांमध्ये परत एक प्रश्न पडतो की,, नवीन वर्ष साजरा करायचा की नाही करायचा.? तर चला आज विचार करूया थोडंसं बिनधास्त जगण्याबद्दल आपण ज्या वेळेस जगात आलो त्यावेळेस कोणतीच तारीख वर्ष आणि दिवस आपल्याला माहीत नव्हते आणि ज्या वेळेस ह्या जगातून आपण निरोप घेऊ त्या दिवशी देखील कोणती तारीख महिना आणि वर्ष असणार आहे याची थोडी देखील कल्पना आपल्याला नसते मग ह्या सर्वांमध्ये जर आनंद साजरा करण्यासाठी एखादा छोटासा क्षण जर निमित्त ठरत असेल आणि त्यामुळे जीवनात निखळ आनंद निर्माण होत असेल तर तो साजरा करताना इतके प्रश्न का,,? अनेक ठिकाणी निखळ आनंद आणि दिखावा यामध्ये फरक योग्य प्रकारे न समजल्यामुळे चुकीच्या पद्धतीने देखील हे क्षण साजरे करतात आणि त्यामुळे अनेक लोकांच्या भावना देखील दुखावल्या जातात त्यामुळे अनेक ठिकाणी वाद विवाद देखील होतात योग्य प्रकारे आनंद साजरा न केल्यामुळे नवीन वर्ष आहे म्हणून खूप महागड्या हॉटेल्स बुक करणे,, इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला परवडणार नाही इतके खर्च करणे,, म्हणजेच नवीन वर्ष साजरे करणे नव्हे. खऱ्या अर्थाने पाहायचे म्हटले तर आनंदाचा कोणताही क्षण असो तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळेपणाने साजरा करता यायला हवा. इंग्रजी नववर्ष साजरे करणे चुकीचे नाही मात्र आपण आपली संस्कृती विसरून जर यातून आनंद मिळवण्याचा किंवा नववर्ष साजरे करण्याचा निर्णय घेत असाल तर ते नक्कीच चुकीचे ठरू शकते. कारण संपूर्ण जगातील आपली हिंदू संस्कृती ही एकमेव अशी संस्कृती आहे, जिने कधीच कोणत्याही संस्कृतीचे अपमान केलेले नाही,, आपल्या हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील नववर्षाचे स्वागत म्हणजे नवीन पालवी, नवीन उत्साह आणि जीवनात येणाऱ्या वैशाख वनव्याला सामोरे जाण्याचे धाडस. अगदी त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यातून जानेवारी महिन्यात प्रवेश करताना देखील कोणताही दिखावा न करता निखळ आनंदाचा शोध घेणे जमले तर आपण हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे केल्याचे सार्थक होईल.
पूनम सुलाने सिंगल,महाराष्ट्र