देशातील गृहमंत्री साहेब.... राजकीय बोलत असताना.. समोरच्या पेक्षा आम्ही वेगळे कसे आहोत हे दाखवून देताना वेगळेच बरळून गेले.ते जाणिव पूर्वक बोलले की बोलता बोलता बोलून गेले...हे संपूर्ण देशाला सांगून संपूर्ण देशाची माफी त्यांनी मागावी.आंबेडकरांचा मान अपमान कोणी कोणी आज घडीपर्यत केला हे संपूर्ण भारताला माहीत आहे.ते सांगण्याची गरज नाही.
ज्या बाबासाहेबांमुळे सर्वसामान्य व्यक्ती तुम्हा राजकीय पंडितांना शाहणपणा शिकवू लागला त्याचा राग तरी मनातून बाहेर आला नसावा..? विरोधकांना आंबेडकर यांचे विचार अचानक कसे आवडू लागले याचे जगातील आठवे आश्चर्य ही पाहायला मिळाले.कारण त्यांना राजकीय कोलीत ऐतेच मिळाले... गृहमंत्र्यांनी थोडे तर डोळे वटारले तर यातील अनेक जन तोंडातून ब्र पण बाहेर काढणार नाही...हे पण सत्य आहे.... तेव्हा त्यांनी झोपताना बाबासाहेबांचे स्मरण करून झोपावे म्हणजे धडकी तरी कमी भरेल.आज काही विरोधकांच्या हातात बाबासाहेबांचे फोटो होते.. काहींच्या तर हातात चुरघाळलेले फोटो होते.त्या फोटोंना फ्रेम पण नव्हती.आम्ही समजून जाऊ आंदोलन करताना फ्रेम असलेले फोटो वापरता येत नसावेत... परंतु तेच आंदोलनातील फोटो घेऊन घरी जा... त्यांना फ्रेम करून आयुष्यभर मी बाबासाहेबांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक विकासाच्या संकल्पनांचा मी देशहितासाठी प्रयत्न करीन अशी सर्व विरोधकांनी मिडिया समोर भिष्म प्रतिज्ञा करावी बसं. लोकांना अजूनही देशात माणूस म्हणून जगता येत नाही...यासाठी सुध्दा आम्ही आंबेडकर विचारधारे सोबत आहेत हे सांगावे.मग कळेल तुमचे खरे प्रेम आहे की बेगडी...
आमच्या अनेक पिढ्यांनी भगवान का नाम इतना लिया है.....सबका साथ सबका विकास अभी तक हमारे भारत ने कभी नहीं देखा.....परंतू एका विशिष्ट परिघाच्या बाहेर त्या लोकांना जाता आले नव्हते.. सामाजिक व सांस्कृतिक स्थिती तुम्ही सर्वजण कोळून प्याला असाल...
हा बदलता भारत आहे. भारतातील लोकांना माणूस म्हणून जगायला आंबेडकर विचारधारा महान ठरली आहे.अनादी कालापासून आम्ही स्वर्गाची संकल्पना ऐकून आहे.पण नरक यातना भारतात अनेक वर्षे लोकांनी सहन केल्या.त्या सहन का कराव्या लागल्या त्यावर पण बोला...आंबेडकर, आंबेडकर .... उतना भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिलता था। या राजकीय टिप्पणी पेक्षा आंबेडकर यांच्या विचारांचा जप ... सत्ताधारी व विरोधकांनी केला असता तर आज जी विषमता पाहतो...ती पहायला मिळाली नसती.
आजपर्यंत आम्ही भ्रष्टाचारात बरबटलेले हात पाहिले.चातुर्ण वर्णव्यवस्था पाहिली,जाती व्यवस्था पाहिली, लुटालूट पाहिली, शासकीय भूखंड हटपलेले पाहिले, बलात्कार पाहिले,दिवसा ढवळ्या खून झालेले पाहिले, गोरगरीबांचे अब्रूचे धिंडवडे उडवून धिंगाणा घालणारे पाहिले तेव्हा भगवान कहां होते हैं...
विरोधकांना आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली होते तेव्हा शहाणपण का येत नाही.राजकीय हुशारी दाखवून काय उपयोग...?
कृषी, उद्योग, खाजगी सावकार,जातीचे अर्थशास्त्र या बाबासाहेबांच्या विचारांवर आपले योगदान काय हे पण सांगावे. तळागाळातील लोकांच्या पुनरुत्थानासाठी आपण दिलेले योगदान पण सांगावे.ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक शोषणाला आतापर्यंतचे सत्ताधारी की विरोधक कारणीभूत आहेत हे पण सांगा की..... मानवाधिकार याबद्दल आंबेडकरांचे विचार व तुमचे विचार काय आहेत ते पण सांगा.... सामाजिक आजारांचे कारण सत्ताधारी व विरोधकांनी एकदा सर्वसामान्यांना समजावून सांगावे.... मगच तुम्हा सर्वांना बाबासाहेब व संविधान समजले आहे.नाही तर आतापर्यंत उलट्या घड्यावर पाणी ओतत...आलाच आहात... येथून पुढे असंच करतं राहणार की..... सामाजिक, आर्थिक लोकशाही बळकट करणार हे पण लोकांना सांगा.... विनाकारण लोकांच्या भावनिकतेला हात घालून भारत मातेचे धिंडवडे काढू नका.
प्रा.आनंदा आलदर
9765066247✒️