प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य
मला माझे मत महत्त्वाचे वाटते.भाग 3
आपल्या देशात मतदान करत असताना अनेक गोष्टी आपण पाहतो. परंतु देश हिताचा विचार करून मतदान करणे फायद्याचे ठरते. अनेकदा काही गोष्टी मनात ठेवून आपण मतदान करत नाही.
सन २०१९ च्या निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर मधील *अनंतनाग* या मतदारसंघात केवळ *८.७ टक्के* मतदान झाले. याचाच अर्थ *१०० पैकी ९* एवढ्या लोकांनीच मतदान केले व त्यामध्ये बहुमत मिळवून कोणीतरी विजयी झाले. परंतु विजयी झालेला उमेदवार हा केवळ अधिकाधीक *५ टक्के* लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असा अर्थ होतो. याचाच अर्थ *१०० पैकी ९५ लोकांची मर्जी नसतानाही* तो लोकप्रतिनिधी बनतो. जम्मू-काश्मीरचा प्रश्नच वेगळा आहे असे आपण कदाचित म्हणाल, परंतु महाराष्ट्रातील मुंबई शहरातील अनेक मतदार संघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नाही.
सन २०१९ मध्ये *मुंबईतील एका मतदारसंघात ४०.२० टक्के* मतदान झाले. या सर्वांचे कारण म्हणजे मला माझ्या मताचे महत्त्व कळलेले नाही. *माझ्या आवडीचा पक्ष - उमेदवार नाही, जाती - धर्माचा उमेदवार नाही, माझी भाषा बोलणारा उमेदवार नाही, मतदान करावा असा लायकच उमेदवार नाही* अशी कारणे आपण देतो व मूठभर लोकांच्या मतांवर लोकप्रतिनिधी निवडून जातात, ही लोकशाहीला घातक अशीच गोष्ट आहे, म्हणूनच *मी माझ्या मताचे महत्त्व जाणले पाहिजे व मतदान केलेच पाहिजे.*
*शंभर टक्के मतदान, देशहितासाठी मतदान*
हा संकल्प मी पूर्णत्वास नेणार, मी जरूर मतदान करणार.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर