जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यअध्यक्ष मोहन जमदाडे यांचे साकडे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी राजा सध्या नैसर्गिक आणि कृत्रिम अशा अनेक संकटांचा सामना करत आहे. या संकटांचा सामना करण्याची ताकद त्याचप्रमाणे होणाऱ्या अन्यायावर ठामपणे प्रहार करण्याची शक्ती शेतकरी वर्गाला द्यावी. असे साकडे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जमदाडे यांनी भवानी माता चरणी घातले.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील जय भवानी तरुण मंडळाच्या देवीचे पूजन जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरीशचंद्र तळेकर, बाळासाहेब जाधव, मंडळाचे अध्यक्ष वैभव आडगळे, उपाध्यक्ष विठ्ठल आडगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष जमदाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जनहित शेतकरी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे कार्य करीत आहेत. शेतकऱ्यांनी ही या शेतकरी एकजूटीच्या चळवळीमध्ये आपला बहुमूल्य सहभाग नोंदवला पाहिजे. तसेच आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली असून भविष्यकाळात ही शेतकरी एकजुटीची ही चळवळ अधिक भक्कम केली जाईल. असेही जमदाडे यांनी सांगितले.