महात्मा गांधींचे विचार कधी ही मरत नाहीत. प्राचार्य सोमनाथ रोडे
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य व अंहिसेच्या मार्गाने, सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधीजी यांचे विचार कधीही मरणार नाहीत असे मत सोलापूर जिल्हा गांधी फोरम यांनी आयोजित केलेल्या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फडकुले सभागृह सोलापूर येथे सुशीलरत्न पुरस्काराच्या वितरणा कार्यक्रमा प्रसंगी डॉ. सोमनाथ रोडे माजी अध्यक्ष सेवाग्राम वर्धा,अध्यक्ष महाराष्ट्र सर्वोदय मंडळ यांनी बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य नरेंद्र बदनोरे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार, माजी प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार होते.व्यासपीठावर मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविकांत पाटील, चपळगाव, एस. एस. शेळके प्रसाराचे अध्यक्ष मल्लिनाथ शेळके वागदरी महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेजचे संस्थापक उमाकांत चनशेट्टी, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ,उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर सुशीला आबुटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संयोजक जिल्हा गांधी फोरमचे अध्यक्ष श्री. सातलिंग शटगार सर यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात बोलताना प्राचार्य सोमनाथ रोडे पुढे म्हणाले की आज देशाला महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज असून त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार गांधी फोरमच्या माध्यमातून होत असल्याने गांधी फोरम या संघटनेचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य नरेंद्र बदनोरे म्हणाले की गांधीजी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने गांधीजीच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तकाचे वाचन करण्याची गरज असून भावी पिढीला गांधीजींचे विचार रुजविण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे.असे ते म्हणाले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की गांधीजींचे विचार कधीही लोप पावू शकत नाहीत.देशाला त्यांच्या विचारांची गरज आहे. म्हणूनच देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांचे पुतळे उभे आहेत.गांधीजींनी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी माजी महापौर प्रा. सुशीलातिई आबुटे , प्रा. भीमाशंकर बिराजदार यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना सुशीलरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल,हार,फेटा, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
आदर्श संस्थापक पुरस्कार रविकांत पाटील- अध्यक्ष, मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ चपळगाव ता. अक्कलकोट, एम.डी.भीमा पाटस सहकारी साखर कारखाना पाटस.
आदर्श संस्थापक पुरस्कार मल्लिनाथ शेळके, एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी,ता.अक्कलकोट.
आदर्श माजी मुख्याध्यापक पुरस्कार आशुतोष शहा, जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर. आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार नीता येरमाळकर, सरस्वती कन्या प्रशाला, सोलापूर.
उपक्रमशील शाळा पुरस्कार :- तिपण्णा कोळी :-साईबाबा प्रशाला सोलापूर
जीवनगौरव पुरस्कार - माजी प्राचार्य मल्लेशी बिडवे, बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रश्नाला निम्बर्गी. ता द.सोलापूर जीवन गौरव पुरस्कार. गुरुपादप्पा तुप्पद माजी प्राचार्य कोनापुरे हायस्कूल, आहेरवाडी ता. दक्षिण सोलापूर.
जीवन गौरव पुरस्कार :- देवेंद्र औटी आदर्श कवी जीवन गौरव पुरस्कार :- लक्ष्मण नागणे, दामाजी हायस्कूल मंगळवेढा.
आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार कविता औदप्पा पुजारी, अण्णासाहेब पाटील प्राथमिक शाळा सोलापूर, अर्चना संतोष जाधव, राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट. नगमा शेख फरकंदा उर्दू प्राथमिक शाळा, सोलापूर,नीता राजकुमार तमशेट्टी,
आदर्श पर्यवेक्षिका सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल सोलापूर,स्नेहल कुलकर्णी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळा सोलापूर सुनील पवार, ग्रामीण विद्या विकास ज्युनिअर कॉलेज तालुका अक्कलकोट, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनिल लोंढे यांच्या सदाबहार संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.आभार सुभाष नागरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी येळमेली यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सचिव नंदकुमार याल्ला, जिल्हा सचिव सोमशेखर भोगडे, गुरू विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा राजश्री तडकासे, कु.नेहा सोमशेखर भोगडे, रमाकांत साळुंखे, चंद्रकांत कोंडगुळे यांनी प्रयत्न केले.राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.