गणेश पुजनातील २१ पत्रींचे महत्व उलगडणार
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री गणेश पुजनातील २१ पत्रींचे औषधी, पर्यावरणीय आणि शस्त्रीय महत्व उलगडुन सांगण्यासाठी परसबाग सोलापूर आणि परसबाग स्री शक्ती च्यावतीने येत्या गणेशोत्सव काळात लोकशिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या परसबाग सोलापूर च्या २१ पत्री प्रारंभिक परिचय सत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
जुळे सोलापूरातील श्री विजय वैभव लक्ष्मी मंदिरामध्ये मंदिर संकुलाच्या प्रमुख सौ.मिनाक्षी जोकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्य श्रेयस बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रारंभिक पत्री परिचय सत्र पार पडले. सौ.स्मिता देशपांडे आणि श्री.शिरीष गोळवलकर या समन्वयकांनी या सत्राचे संयोजन केले होते.
दरवर्षी आपण पारंपरिक श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. श्री गणेशाचे पुजन करताना आपण २१ पत्रींचा वापरतो.परंतु त्याचे आपल्याला होणारे उपयोग याबाबत मात्र आपणच अनभिज्ञ असतो. या २१ पत्रींचे औषधी, पर्यावरणीय आणि शास्त्रीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.सुसह्य पर्यावरणासाठीच्या लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून श्री गणेशभक्त सामान्य नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि बागकर्मींना याची माहिती देण्याचे आम्ही योजिले आहे. त्यासाठी श्री गणेशोत्सव पूर्व आणि उत्सव काळात
परसबाग सोलापूर हे स्वयंसेवी पर्यावरणीय व्यासपीठ आणि परसबाग स्री शक्ती, सोलापूर यांच्यावतीनें एक छोटेसे पण महत्वपूर्ण लोकशिक्षण अभियान हाती घेण्यात येणार आहे.
प्राथमिक माहिती नुसार सोलापूरात अशाप्रकारचा कार्यक्रम अथवा लोकशिक्षण अभियान प्रथमच आयोजित करण्यात येत आहे.या अभियानात सोलापूर शहरातील वेगवेगळी श्री गणेशोत्सव मंडळे,श्री गणेश मंदिरे, शाळा,गृह संकुले, आस्थापना या सारख्या निवडक ठिकाणी ११ माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी सौ.गौरी गोळवलकर,कु.अनुश्री गोळवलकर,सौ.पद्मजा संगवे,श्री.श्रीराम रामदासी,श्री.राजेंद्र आमले,श्री.विजय टाकळीकर,श्री.योगेश जक्कल,सौ.वैशाली कुलकर्णी,श्री.आनंद देशपांडे,श्री.वल्लभ कुलकर्णी,सौ.स्नेहा कुलकर्णी,श्री.वेदांत कुलकर्णी,श्री.जितेंद्र लाड,जहागीरदार,सौ. बेडेकर पंडित आदी शिलेदारांनी या प्रारंभिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागातून सहकार्य केले.अधिक माहितीसाठी स्मिता देशपांडे (समन्वयिका) +91 94037 01935 आणि शिरीष गोळवलकर (समन्वयक)+91 89568 77333 यांच्याशी संवाद साधावा असे आवाहन परसबाग सोलापूर आणि परसबाग स्री शक्ती च्यावतीनें करण्यात आले आहे.