पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
आई मुलाला जन्म देते. तिला गर्भधारणे पासून मुल चालते होईपर्यंत जे कष्ट, वेदना, त्रास, काळजी, घ्यावी लागते.जवळ जवळ त्याच गोष्टी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ,करण्यासाठी कराव्या लागतात.
मंगळवार दि 17-9-24 रोजी सरकोली ता पंढरपूर पर्यटन स्थळावर आम्ही बालकांच्या सहकार्याने श्रमदानातून आदरणीय भास्करराव बाबूराव भोसले यांनी दिलेली 22 केशर आंबे,3 बहुआ,2 बांबू,20 गुलाबी कण्हेर ,6फणस, रोपे लागवड केली. चांगले बिज तयार करणे,वृक्ष रोपे निर्मिती
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या गोष्टी देखील कष्ट, चांगली देखभाल, वेळेवर खत, पाणी, शेळ्या जनावरां पासून संरक्षण करणे, अचानक लागणारी आग,या गोष्टीचे नियोजन करूनच वृक्ष तयार होतो.आगदी लहान मुलां प्रमाणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करावे लागते.
बऱ्याच वेळा, सरकारी यंत्रणेव्दारे, नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रम, या निमित्ताने वृक्षारोपण केले जाते,झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला जातो.परंतू यातून लावलेल्या पैकी किती वृक्ष जगले, वाढले याची आकडेवारी पाहिली तर कधी कधी ती मायणस मध्ये असते.वृक्षारोपण हे फार सोपे आहे.परंतू वृक्ष संवर्धन करणे हे जोखमीचे काम आहे.या बाबत वृक्ष संवर्धनाची जोखीम कोणीही घेत नाही.प्रत्येकाला ही जबाबदारी नको वाटते.वृक्षारोपणाचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला की वृक्षसंवर्धन कामाचे नियोजन केले जात नाही.पुढच्या कामाची जबाबदारी संपली अशी मानसिकता निर्माण झाली आहे.बऱ्याच लोकांची अशी मानसिकता आहे वृक्षारोपण करणे किंवा वृक्षसंवर्धन करणे हे आपले कामच नाही.त्या कामाचा आपला काय संबंध.बऱ्याच लोकांना वृक्षारोपणाचे महत्व माहीत नाही.अलीकडे लोकसंख्या वाढीमुळे जमीनीचे तुकडीकरण झाले.शेतातील मोठ मोठ्या ताली,बांध मोडून टाकले त्यावरील झाडेही तोडली, काही शेतकऱ्यांनी झाडाखाली पिक व्यवस्थीत येत नाही म्हणून झाडे तोडली.अशी बरीच कारणे वृक्ष नष्ट करण्याची आहेत.या बाबत सरकारी नियम असून देखील सरकारी यंत्रणा लक्ष देत नाही.व माणूसही हे नियम पाळत नाही.सरकार निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षन, या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देत नाही.कारण या नाॅलजची माणस लोकप्रतिनिधी म्हणून निवडली जात नाहीत.एकाही लोकप्रतिनिधीला वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण संतुलन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड याचे काहीही महत्व माहीत नाही.शहरामध्ये कुठेतरी एखाद झाड उरल आहे.उन्हाळ्यात या झाडाखाली मोटार सायकली,माणस,जनावरे यांना उभे राहण्यासाठी जागा नसते एवढी गर्दी त्या झाडाखाली असते.वृक्ष कर मात्र लावले जातात.वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन याचे प्रशिक्षण प्राथमिक शाळेपासून कंपलसरी पाहिजे.नुसत्या वृक्ष दिंडी काढू काहीही उपयोग नाही.वृक्ष संवर्धन या बाबतीत कायदा असून उपयोग नाही तो मानला पाहिजे.राखीव जागांच जस नियोजन असते त्याच पद्धतीने प्रत्येक शेतात ठराविक क्षेत्रात वृक्ष लागवड आवश्यक करावी.ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी सार्वजनिक जमीनीवर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले पाहिजे.या मध्ये पारदर्शकता पाहिजे.अलीकडे माणसांना कष्ट नको.फुकट व सवलतीचे कितीही द्या ते चालते.
झाडांपासून आपणास फळे, सावली, पर्यावरण संतुलन, शुद्ध ऑक्सिजन, हावेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जातो ,खत, पाऊस , जमीनीची धूप थांबविणे,हावेतिल आद्रता अशा बऱ्याच गोष्टी मिळतात.मग आपण नितीमत्तेच काम म्हणून, किंवा झाड आपले जिवन संरक्षीत करते म्हणून तरी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करूया.व पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी काम करूया.सेवेकरीता बंधू विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार 9923433535 हे कार्य करीत आहेत.