-शिवसेना(उबाठा) तालुका प्रमुख बोडकेचीं प्रशासनावर कारवाईची मागणी
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शहराला अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे.देशातील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या तीर्थस्थळाला देशा विदेशातुन भाविक भेट देत असतात. मात्र त्रंयबकेश्वर नगरपालिकेचे स्वच्छता राखण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके पाटिल यांनी केला आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शहराच्या सुरवातीलाच नगरपरिषदेने माझी वसुंधरा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवदेवतांचे व त्र्यंबकराजाचे चित्र रेखाटलेले आहे.या रेखाटलेल्या चित्राची अत्यंत दैनिय अवस्था असुन याठिकाणी घाणीचे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे .
चित्र रेखाटलेल्या त्या भिंतीवर अक्षरशः रात्रीच्या वेळेस लघुशंका केली जाते. नगरपरिषद कुठलीही साफसफाई स्वच्छता करत नाही..यामुळे सदर चित्रांची विटंबना होऊन हिंदुधर्मीयांच्या भावना दुखवल्या जात आहेत.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने माझी वसुधंरा हे अभियान राबवले कि केवळ देखावा करत आहे.पदाधिकारी व शासकिय आधिकारी,कर्मचारी केवळ खुर्च्या उबवण्यापुरतेच आहे का असा संतप्त सवाल बोडकेनीं केला आहे.दरम्यान याकडे दुर्लक्ष करणार्या नगरपरिषद प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी. व सदर ठिकाणी स्वच्छता ठेवून पावित्र्य राखावे अशी मागणी समाधान बोडकेपाटील यांनी केली आहे.