पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यात पावती (रेव्हेन्यू स्टॅंप)तिकिटांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून,ती त्वरीत उपलब्ध होण्यासाठी ग्राहक पंचायतीने मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा कोषागार कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
बॅंका, पतसंस्था यांची कर्ज प्रकरणे,विविध व्यापारी संस्था, आस्थापना इ.ना रु. ५०००/-च्या पुढील दैनंदिन व्यवहारासाठी पावती तिकिटांची आवश्यकता असते. मात्र सध्या जिल्ह्यातील टपाल कार्यालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक व्यवहार थांबले आहेत.ही गरज लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना ती मिळविण्यासाठी हिंडावे लागत आहे.ती सहज उपलब्ध व्हावीत यासाठी ग्राहक पंचायतीमार्फत मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा कोषागार कार्यालयाशी पत्रव्यवहार करून ती लवकरात लवकर जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ती लवकरच उपलब्ध होतील अशी अपेक्षा प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल जिल्हा सचिव सुहास निकते पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव धनंजय पंधे यांनी व्यक्त केली आहे.