पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव अनवली तपकिरी शेटफळ या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने शक्तिपीठ रस्ता झालाच पाहिजे या मागण्याचे निवेदन पंढरपूरचे प्रांताधिकारी इथापे यांना देण्यात आले.
या भागातून बागायती क्षेत्र असल्यामुळे फळ बागा असल्याने शेतकरी रस्त्याच्या अडचणीला सामोरे जात आहे सदर महामार्ग झाला तर या भागातील फळ पिके राज्यातील विविध भागांमध्ये वाहतूक करण्याची सोय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही विकास व्हावा ही शेतकऱ्यांची इच्छा असून परंतु मोबदला देताना शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग प्रमाणे मोबदला मिळावा अशी ज्यांच्या शेतातून रस्ता जाणार आहे या शेतकऱ्याची मागणी आहे काही राजकारणी लोक विनाकारण विकास कामात अडथळा निर्माण करीत आहेत.
परंतु बाधित शेतकऱ्यांची मागणी वेगळीच आहे महाराष्ट्र शासनाने तातडीने या शेतकऱ्यांची बैठक घेऊन या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत हा रस्ता तयार केला पाहिजे अशी मागणीचे निवेदन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली कासेगावचे नेते विजयदादा देशमुख व शेतकरी बांधव यांच्या वतीने सुमारे 700 शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन आज देण्यात आले.
यावेळी लिंगराज होनमाने,काशिनाथ हाके जयवत देशमुख उपस्थित होते