पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असूनसुद्धा ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिलेले अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयाची थकहमी देऊन जाहीर सभेत दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अभिजीत पाटील यांना तो शब्द दिला होता. आज तो शब्द खरा करून दाखवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाकडून अभिनंदन करून आभार मानले जात आहेत. सभासदामधून देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आदर युक्त समाधान व्यक्त केले जात आहे.