तांदुळवाडी प्रतिनिधी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ऊक्तीला अनुसरुन आज तांदुळवाडी ता माळशिरस या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातील वातावरणातील बदलत्या तापमानापासुन भविष्यात आपली सुटका व्हायची असेल तर वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे ओळखून आम्ही तांदुळवाडी कर समाजसेवेचा वसा घेतलेले काही तरुण एकत्र येवुन तांदुळवाडी गावात वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला.
त्याची मुहूर्तमेढ आज केली व गावाचे बाहेरुन जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची वृक्षलागवड केली. गावातील तरुणांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले . अनेकांच्या सक्रिय सहभागामुळे दोनशे पन्नास चे आसपास वृक्षलागवड दोन तीन तासाचे दरम्यान करता आली.
या सुंदर कार्यक्रमातच नविन १ उपक्रम की नुकताच नीट च्या परीक्षेचा निकाल लागला त्यात तांदुळवाडी गावातील कु धनश्री जगताप हिने ६३५,कु साक्षी गुजरे हिने ५६६,कु वृक्षाली काकडे हिने ५४१ व कु साक्षी मिले हिने ४५० गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
त्याबद्दल त्यांचे शुभहस्ते वृक्षलागवड करुन त्यांचा यथोचित सन्मान यानिमित्ताने करुन १ नविन पायंडा पाडला. विशेषतः यासाठी चा खर्च तरुण सहकारी मित्रांनी स्वकष्टार्जित रकमेतून वर्गणी करुन केला. यात सहभागी सर्व मित्रमंडळींच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.