पंढरपूर प्रतिनिधी
दि १५ मार्च पासून सुरू झालेल्या सनराईज फेस्टिवल ची सांगता शनिवार दि १६ रोजी साहित्य क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्काराने,विध्यार्थी गुणगौरव व बालचमुंच्या नेत्रदीपक कला अविष्काराने झाली,पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे मा. आमदार दत्तात्रय सावंत, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सांगोला तालुक्याचे युवा नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख,महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल्स चे संपादक अविनाश सुर्वे यांच्या शुभहस्ते साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच आदर्श पालक म्हणून श्री. विकास साळुंखे,आदर्श विध्यार्थी म्हणून ओम विष्णू गायकवाड, आदर्श विध्यार्थीनी कु. दिव्या राजू कडलास्कार तसेच आदर्श शिक्षक श्री. राम मोकळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवले बद्दल विध्यार्थ्यांना ही गैरवण्यात आले, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव (अण्णा)बागल,सामाजिक कार्यकर्ते विशाल अर्वे, पंढरपूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन एकनाथ फाळके, राजेश पवार, ज्ञानकांचन हॉस्पिटल चे डॉ. संजयकुमार सरडे,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ नाईकनवरे, सिद्धेश्वर बंडगर,धनाजी काळे,अशोक तोंडले,गणेश ननवरे,पोलिस नाईक विठ्ठल विभूते ई उपस्थित होते.
प्रसंगी वाखरी ग्रामपंचायत च्या आदर्श सरपंच धनश्रीताई तानाजी साळुंखे,गादेगावच्या सरपंच दिपालीताई धनाजी बागल,कौठाळी गावच्या सरपंच आनीताताई अरुण नागटिळक,खेडभोसे गावचे सरपंच संतोष अर्जुन पवार ई. कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे मा.आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या चढत्या अलेखाचे कौतुक केले,तसेच प्रशालेची गुणवत्ता, कोणत्याही कार्यक्रमाचे अचूक आणि काटेकोर नियोजन,त्याची अंमलबजावणी करणे हे सनराईज पब्लिक स्कूल च्या व्यवस्थापन मंडळाकडून शिकावे असे गौरवोद्गार काढले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले की प्रशालेच्या सुरवातीच्या काळातही मी या प्रशाले सोबत खंबीरपणे उभा होतो,आज ही आहे, भविष्यात ही राहीन,त्यानंतर आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत, या तीन ध्येयवेड्या मित्रांनी घेतलेलं परिश्रम आज फळाला आलेलं दिसून येत आहे,पंचक्रोशीतील पालकवर्ग आणि जनसमुदाय इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित आहे यावरूनच प्रशालेच्या गुणवत्तेचा दर्जा समजतो,ज्ञानकांचन हॉस्पिटल चे डॉ.संजयकुमार सरडे यांनी प्रशालेत होणाऱ्या उपक्रमाचे,गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे कौतूक केले, महाराष्ट्र माझा न्यूज चे संपादक श्री.अविनाश सुर्वे यांनी प्रशालेत होणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाबरोबर विध्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे म्हणून घेण्यात येणारा बाजार डे, विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्भया पथकाच्या पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून वारंवार देण्यात येणारे समुपदेशन,स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन,दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश जेष्ठ विधिज्ञ बोलावून कायदेविषयक करण्यात येणारी साक्षरता या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला,शिक्षणाबरोबरच उद्योग,व्यवसाय,संस्कार,गुणवत्ता,समाजकारण आणि अर्थकारण या सप्तपदीची काटेकोर अंमलबजावणी करणारी ही सर्वगुणसंपन्न प्रशाला असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
साहित्य क्षेत्रातून मोलाची ठेव या पुस्तकासाठी सांगलीचे ऍड कृष्णा पाटील,उसवन या साहित्यकृती साठी बीड चे लक्ष्मण दिवटे, काहूर या काव्य संग्रहासाठी पुण्याच्या माया मुळे, माणुसकीचे आभाळ या साहित्यकृती साठी बार्शीचे रामचंद्र इकारे,काजवा या कादंबरी साठी पुण्याचे प्रा.पोपट काळे, ज्ञानमंदिरातील नंदादीप या चरित्रासाठी पंढरपूर चे प्रा.शिवाजीराव बागल,खुशाल चेंडू या साहित्यकृती साठी बार्शीचे आबासाहेब घावटे,झाड एक मंदिर या बाल साहित्यासाठी नांदेड च्या स्वाती कान्हेगावकर, सवळा या साहित्यकृती साठी साताऱ्याचे विठ्ठल खिलारी तर ऐतिहासिक साहित्यकृतीसाठी विशेष पुरस्कार म्हणून पंढरपूर चे विद्याधर भोसले या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, साहित्यिकांमधून प्रा.शिवाजीराव बागल यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या योग्य दिशेने चाललेल्या घौडदौडी बद्दल शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, सचिव अंकुश गाजरे व उपाध्यक्ष अजित लोकरे या सर्वांचे विशेष कौतुक करण्यात आले,सदर कार्यक्रमाचे सुरेख नियोजन करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.