शासन आणि सरकार शेतकऱ्यांकडे प्रचंड डोळेझाक करत आहे- डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी
यावर्षी संबंध महाराष्ट्र मध्ये दुष्काळ पडलेला असून सध्याच्या परिस्थितीमध्ये खेडोपाडी, गावोगावी पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही, दोन दोन तीन तीन किलोमीटरवर चालून एखाद्या विहिरीत किंवा तलावात असलेले पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे, महाराष्ट्रात आंदोलना,मोर्चे, रास्तारोको प्रचंड प्रमाणात चालू आहेत कारण सरकार वर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही आणि विश्वासाचं नेता कधी केंव्हा काय करेल याचा नेम नाही कधी आणि केंव्हा कोणत्या पक्षात कोन उडी मारेल याचाही नेम नाही त्यामुळे जनतेमध्ये असंतोष असून सध्या राज्यात दुष्काळाच्या प्रचंड झळया लागत आहेत शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष असून एक तर शेतीमध्ये पीक नाहीये आणि दुसरी गोष्ट पिण्यासाठी पाणी नाहीये त्यातच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पशुधनासाठी गुरा ढोरांसाठी हिरवा चारा नाहीये आणि त्यांना पिण्याचे पाणीही नाहीये. अशा बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने इकडे तिकडे दुसरीकडे डोकं न लावता दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे भयानक वास्तव असून गावोगावी विहिरी बोर आणि तलाव कोरडे ठाण पडलेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव असं म्हणणार सरकार पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करणारी घरातील माता,माऊली अबालवृद्ध आणि स्त्रियांसाठी काय काय योजना राबवणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरते टँकर पाठवले जातात परंतु ते पाणी सर्व गावाला पुरत नाही कुणाकडे पिण्याच्या पाण्याचे साठवण करण्यासाठी पुरत्या भांडवला अभावी टाक्या, हौद किंवा इतर साधन उपलब्ध नाहीयेत त्यामुळे पाणी साठवणार तरी कसं आणि किती ? हा प्रश्न आहे आणि साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार हा गहण प्रश्न सर्व सामान्य लोकांच्या घरांमध्ये आहे शिंदे सरकार यांनी आपण सरकार आहोत या नात्याने लोकांचा जन-सामान्यांच्या आक्रोशाच निवारण करून आपण सर्वांसाठी चांगल्या योजना राबवतो आहोत त्याचप्रमाणे गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या एक हजार लिटरच्या टाकी आणि जनावरांसाठी पाचशे लिटरची टाकी देण्यात यावी अशा पद्धतीची योजना तात्काळ राबवली गेली पाहिजे त्याचबरोबर त्या टाकीमध्ये दर दोन दिवसाला स्वच्छ टँकरने पाणी दिले गेले पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये राबवण्यात आलेली नळ योजना ही त्या गावातील भस्मासुरांनी सरपंच उपसरपंच व ज्यांनी ते काम घेतलेला आहे त्यांनी उंदरासारखी कुरतडून खाल्लेली आहे त्यामुळे मोठ मोठ्या तलावातून धरणातून आणलेले पाईप ह्या भस्मासुर नावाच्या दोन पायाच्या उंदरांनी अशी कुरतडून खाल्लेली आहेत की त्यातून एक थेंबही गावापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक गावामध्ये सरपंच व त्याच्या आखत्यारीतल्या लोकांनी पहिला गुहा पाईपलाईनचाच खाल्लेला आहे आणि दुसरा गुहा गटारीचा खाल्लेला आहे काही अपवाद असूही शकतात नाही असे नाही पण त्याचबरोबर गावातील विद्युत खांबे विद्युत लाइट्स या फक्त स्वतःच्या जवळच्या कार्याकर्त्याच्या घरासमोर लावून तेवढा उद्धार केलेला दिसतो त्यातही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे.
त्यामुळे प्रत्येक गावातील पाण्यामध्ये झालेला गैरव्यवहार, टँकरच्या खेपा मध्ये झालेला गैरव्यवहार, पाणीपुरवठा नियोजन समितीमध्ये झालेला गैरव्यवहार, गावातील वेगवेगळ्या योजनांमध्ये झालेला गैरव्यवहार,गावातील कूपन वाटपाचा झालेला गैरव्यवहार यावरती एसआयटी नेमून ते भ्रष्टाचाराचे पाळेमुळे बाहेर काढले पाहिजे परंतु असं न होता समाजासाठी एकनिष्ठ लढणारा मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीची चौकशी लावून लोकशाहीला दडपण्याचा कार्यक्रम येथील सरकार करत असल्याचे आरोप डॉक्टर जितिनदादा वंजारे खालापुरीकर यांनी केला आहे. सरकार हे जनतेचे मायबाप असून जनता दुष्काळाच्या झळ्यामध्ये होरपळत असताना एसीमध्ये बसणारे टकुचे जोपर्यंत ग्रामीण भागातील उजाडलेल्या माळराणी येऊन दुष्काळातील सूक्ष्म अती सूक्ष्म कणांनी टोकदार झालेल्या काट्यांना पायदळी तोडून डोंगर खेड्यामध्ये वाडी वस्ती पाड्यांवरती गावोगावी फिरून दुष्काळाचा अहवाल निर्माण करून पूरत्या आणि सशक्त अशा योजना राबवणार नाहीत तोपर्यंत माझा महाराष्ट्र सदन होणार नाही फक्त सत्ता नसतानाच या पुरोगामी महाराष्ट्राच्या भल्याच्या गोष्टी करणारे आणि सत्ता आली की बांडगुळांसारखे लपून बसणारे जेही नेते महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी स्वतःला लाजा वाटू द्या. कारण तुम्ही पण एक शेतकरी पुत्र आहेत महाराष्ट्रातील नव्हेच तर कृषीप्रधान भारत देशामध्ये शेतकरी हाच सर्वांचा ग्राहक असून तो सर्वांनाच दाता आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या जवळ काही नसेल तर 'आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून' अशी परिस्थिती निर्माण होऊन येथील उद्योग धंदा नोकरी व्यवसाय सर्व स्तरातील लोकांना फटका फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमुळेच होऊ शकतो त्यामुळे शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू आणि शेतकऱ्याला जगायला नाही जमलं तर सरकार असो किंवा कोणीही तुमच्या बोच्यावर लाथा दिल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही.त्यामुळे मायबाप सरकार केंद्रातील आणि राज्यातील यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे दुष्काळी परिस्थितीच्या परियोजना राबऊन शेतकऱ्यांवरती कल्याणकारी योजना मंजूर करून पुण्य करण्याचे काम करावे.
महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी नदीजोड प्रकल्प ही संकल्पना दिली होती, तो नदीजोड प्रकल्प आजतागायत अमलात आलेला नाही शिरूर तालुक्याच्या,पाथर्डी तालुक्याच्या आणि गेवराई तालुक्याच्या अतिशय जवळ धरण असताना केवल उपाययोजना अभावी हे पाणी या तालुक्याला मिळत नाही. या तालुक्यांची परिस्थिती 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशा पद्धतीची परिस्थिती आहे हेच पाणी दरवर्षी नवीन पावसाळ्यामध्ये जशास तसे वाहून खाऱ्या समुद्राला मिळते परंतु त्या पाण्याचा शेतीसाठी पाटाद्वारे नियोजन केलं जात नाही त्या पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो नदीजोड प्रकल्पामध्ये महाराष्ट्राची इतर कोरडी जमीन ओलिताखाली येऊ शकते साधे इतकं गनीत सुद्धा या राजकीय लोकांना कळू नये इतकी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील तमाम मंत्रिमंडळ जलसंपदा मंत्री,भूसंपादन मंत्री व शेतकी lशी रिलेटेड कृषी मंत्री वगैरे लोक असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की नदीजोड प्रकल्पावरती भर देऊन अधिकाधिक शेतकऱ्याला जलसिंचनाचा फायदा होईल अशा पद्धतीच्या योजना राबवून महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागांमध्ये कोरडा दुष्काळ पडतो त्या त्या भागामध्ये पाण्याच्या परियोजना राबवल्या गेल्या पाहिजेत आणि या कृषीप्रधान देशाचं एकच लक्ष असलं पाहिजे की येथील शेतकरी सुखी झाला पाहिजे तुमच्या दोन-दोन हजार रुपये सन्मान निधीचा आम्हाला कसलाच फायदा होत नाही जिवो नेटवर्क प्रमाणे सुरुवातीला फुकट देऊन नंतर रेट वाढवायचे आणि एक वर्ष फुकट देऊन जिंदगीभर महाग नेटवर्क देऊन पैसा लुटायचा अशा पद्धतीचं काम हे सुटा बुटावाल सरकार करत आहे कारण दोन दोन हजार रुपये सन्मान निधी देऊन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव न देता शेतकऱ्यांचा वापर कचऱ्याप्रमाणे करत आहे परंतु आता यापुढे असं होऊ दिल जाणार नाही शेतकऱ्यांनी पक्षपातपणा, धर्मवादपणा बाजूला ठेवून मोठमोठी आंदोलन उभा केली पाहिजेत.काळया आईचा मान राखून एकजूट होऊन मोठ मोठे आंदोलन केली पाहिजेत आणि शेतीच्या सिंचनाच्या व शेतीला पूरक असणाऱ्या योजना राबवण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. नसता शेतकरी जर कंगाल झाला त्याने जर शेती करणं सोडून दिलं तर दगड खाऊन तुम्ही जगू शकत नाहीत तेच दगड मारण्याची ताकद ज्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये येईल त्या दिवशी तुमचे काचेचे बंगले एकही राहणार नाहीत. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.